आणखी एका गावात कोरोना विस्फोट … सामूहिक जेवणानंतर 93 लोकांना कोरोनाची बाधा; गाव झाले कंटेनमेंट झोन.

बुलढाणा दि.14 एप्रिल – देशात सर्वाधिक कोरोना विषाणू (Corona virus) संसर्ग महाराष्ट्रात (Maharashtra) आहे. राज्यात कोरोनाच्या बाधितांचा आकडा वेगात वाढत आहे. आता ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा (Corona virus) प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यातील प्रकारानंतर राज्यात आणखी एका गावात कोरोना स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. सदरील घटना बुलढाणा जिल्ह्यातील पोटा या गावात घडली आहे. तिथे सामूहिक जेवणानंतर 93 लोकांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असून यानंतर गावातील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
(Corona blast in another village … Corona infect 93 people after mass meal; The village became a containment zone.)
संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन (Containment zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यानी 700 हून अधिक लोकसंख्या असलेले पोटा गाव कंटेन्ट झोन म्हणून जाहीर केले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एप्रिलच्या सुरुवातीस येथे झालेल्या तपासणी शिबिरात ग्रामीण भागातील 15 लोक कोरोना संक्रमित (Corona Positive) झाल्याचे आढळले. त्यानंतर काही दिवसांनंतर झालेल्या दुसर्या शिबिरात 78 लोकांना संसर्ग झाल्याचे आढळले.
एकत्र जेवण कार्यक्रमाबाबत प्रशासनाकडून कसलेही मार्गदर्शन होत नाही. महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना काळात सरकारकडून कोविड नियम लागू करण्यात आले आहेत. असे असताना एकत्र गाव जेवण कसे काय दिले जाते. स्थानिक प्रशासनाकडून याला परवानगी कशी दिली आदी प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच याबाबत स्थानिक प्रशासनाकडून काहीही सांगण्यास नकार देण्यात आला आहे. एकाच गावात 93 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याने गावाच आता कंटेन्मेंट झोन (Containment zone) घोषीत करण्यात आले आहे.
पोटा गावात आयोजित मेजवानीला हे सगळे लोक उपस्थित होते. त्या वृत्तानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया दिली नाही. वास्तविक, कोविड -19 च्या कोरोना रुग्णाच्या निधनानंतर नुकतेच खामगाव येथे मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी एका गावकऱ्याने सांगितले की त्या मेजवानीत बरेच लोक सहभागी झाले होते. यामुळे अधिकाधिक लोकांची कोरोना चाचणी घेण्यावर आता प्रशासनाचा भर आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड सेंटर येथे पाठवले जात आहे, तर लक्षणे नसलेल्यांना घरी क्वारंटाईन राहण्यास सांगितले गेले आहे. आरोग्य विभाग सर्व बाबींवर बारीक नजर ठेवून आहे.