गणेशोत्सवानंतर राज्यात होणार कोरोना विस्फोट ? आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा.

मुंबई दि.13 सप्टेंबर – गणेशोत्सवानंतर राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये (Corona patients) वाढ होण्याची शक्यता महाराष्ट्रातील आरोग्य अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. केरळमधील ओणम (Onam) सणाचा दाखला देत सणानंतर केरळमध्ये (Kerala) झालेली रुग्णवाढ पाहून त्यांनी राज्यातील 10 दिवसांच्या गणेशोत्सवावरून सावध केले आहे.
(Corona blast in the state after Ganeshotsav; Health officials warn.)
गणेशोत्सवानंतर कोरोना संसर्गात वाढीची शक्यता
राज्य सर्वेक्षण अधिकारी (Survey Officer) डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, “सणांनंतर गर्दी वाढते आणि नागरिक कोरोनाचे मूलभूत नियम पाळणे विसरतात. जसे की मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे.” ते म्हणाले की, राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना सल्ला जारी केला आहे आणि पाच जिल्ह्यांना खबरदारी घेण्यास सांगितले आहे. चाचण्यांची सुविधा तसेच रुग्णांचे विलगीकरण आणि औषध व्यवस्था इत्यादींबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या सात दिवसांपासून राज्यात चाचणी सकारात्मकतेचा दर 2.67 टक्के आहे, परंतु अधिकारी आठ जिल्ह्यांमध्ये उच्च चाचणी सकारात्मक दराबद्दल चिंतित आहेत. कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट्स (variants) मोठ्या प्रमाणात संसर्ग (infection) पसरवत आहेत. दुसरीकडे, लसीकरण (vacccination) मोहीमही सुरू आहे.
आरोग्य अधिकारी म्हणतात की, एकीकडे राज्य सरकारने गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या प्रमाणात साजरा न करण्याविषयी सांगत आहे, दुसरीकडे कोकणात लोकांना नेण्यासाठी हजारो बसेस तयार ठेवण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत आपण व्हायरसवर नियंत्रण कसे ठेवू शकतो? 9 फेब्रुवारीनंतर शनिवारी पहिल्यांदा महाराष्ट्रात सर्वात कमी कोरोना रुग्णांची (3,075) नोंद झाली. 361 नवीन रुग्ण मुंबईत आढळले, ज्यामुळे संक्रमित लोकांची एकूण संख्या 16,015 झाली. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात (Maharashtra) आतापर्यंत 64,94,254 लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे.