राज ठाकरे यांच्या मुळे कोरोना वाढला! पोलिसात तक्रार

औरंगाबाद दि. 7 मार्च : राज ठाकरे यांच्या मास्क न लावण्याच्या आव्हानामुळे राज्यात कोरोना (corona) संसर्ग वाढला असल्याचा आरोप करत औरंगाबाद (Aurangabad) येथील क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात क्रांतिचौक पोलीस ठाण्यात (Police station) अॅड. रत्नाकर चौरे यांनी तक्रार दिली असून पोलीसांकडून ती दाखल करुन घेण्यात आली आहे.

(Corona grew because of Raj Thackeray! Report to police)

मराठी भाषा दिनानिमित्ताने राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील कार्यक्रमात मास्क (Mask) लावणे टाळले होते. याशिवाय नाशिक येथे दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी माजी महापौराला मास्क लावण्यावरुन प्रतिक्रिया दिली होती. यामुळे राज ठाकरे यांचं मास्क प्रकरण बरंच चर्चेत आले होते. माध्यमांसमोरही राज ठाकरे यांनी मी मास्क घालणार नाही असे वक्तव्य केले होते.

5 मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी नाशिकमध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या परिसरात एकच गर्दी केली होती. राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी फुलाचा पुष्पगुच्छ घेऊन माजी महापौर अशोक मुर्तडक समोर आले होते. अशोक मुर्तडक यांनी तोंडावर एकावर एक असे दोन मास्क लावले होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या तोंडावर दोन मास्क पाहिले आणि ‘मास्कवर मास्क’ असं विचारताच मुर्तडक यांनी मास्क (Mask) बाजूला केला.

राज ठाकरे यांच्या या भुमिकेमुळे सर्वसामान्य नागरिकांत चूकीचा संदेश गेला असून मास्क वापरणे अनेक जण टाळत आहेत. यामुळे कोरोना (corona) प्रादुर्भाव वाढण्यास मदत झाली. राज ठाकरे (Raj Thakre) यांच्या मास्क न लावण्याच्या आव्हानामुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढला असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. औरंगाबाद (Aurangabad) पोलिसांनी मात्र अद्याप या बाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!