ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ; आक्रमक विरोधकांसमोर सरकारवर नामुष्कीची वेळ

मुंबई: दि.10 मार्च- सध्या मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी भाजपनं मंगळवारी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली. यावेळी अनिल देशमुख यांनी काल अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण (Anvay Naik Death Case) दाबल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. त्या प्रकरणी फडणवीस यांनी देशमुख यांच्याविरोधात आज हक्कभंगाची नोटीस दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर यापुर्वीच हक्कभंग दाखल झालेला असून आता ज्येष्ठ मंत्री आशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या वरही हक्कभंग करण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलिस अधिकारी वाझे यांची क्राईम ब्रांचमधून इतत्र बदली करण्याची नामुष्की आली असून भाजपने मात्र निलंबनाची मागणी केली आहे.

(Increase in difficulties of Thackeray government; Time to humiliate the government in the face of aggressive opposition)

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. अनिल देशमुख यांनी काल अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण (Anvay Naik Death Case) दाबल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. त्या प्रकरणी फडणवीस यांनी देशमुख यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली.

देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला. ‘अन्वय नाईक यांची हत्या झाली नसून आत्महत्या आहे. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल देताना आत्महत्येस प्रवृत्त केलं नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबलं असं म्हणणं चुकीचं आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सभागृहातदेखील सांगितला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असतानाही अशा प्रकारचं विधान देशमुख यांनी केलं. हे विधान न्यायालयाचा अवमान करणारं असल्याचं फडणवीस म्हणाले.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे असून ते त्यांनी जाणूनबुजून केले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. अन्वय नाईक यांच्याबद्दल केलेलं विधान अनिल देशमुख यांनी एकदा केले नसून त्यांची पुनरावृत्ती केली. सदर वक्तव्य करून त्यांनी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. मला जे स्वातंत्र्य मिळाले आहे, त्याचा भंग त्यांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण विशेष हक्कभंग समितीकडे पाठवावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

आशोक चव्हाण यांच्या वरही येणार हक्कभंग…
यासोबतच देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, सभागृहात कॕबिनेट मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज मराठा आरक्षणासंदर्भात खोटे निवेदन केले. १०२ ची घटनादुरूस्ती मराठा आरक्षण कायद्याला लागू होत नाही. अॅटर्नी जनरल संदर्भातील वक्तव्य चुकीचे केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी भाजपनं घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांची क्राईम ब्रांचमधून बदली केली असल्याची माहिती सभागृहात दिली. मात्र आक्रमक विरोधकांनी सभागृहात गदारोळ करत बदली नव्हे निलंबन हवे म्हणत गोंधळ घातला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!