नरभक्षक बिबट्या जेरबंद केल्याशिवाय गावी जाणार नाहीत…

आष्टी दि.२ (प्रतिनिधी) आष्टी (Ashti) येथील पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील संरपचांच्या बैठकीत बोलताना नरभक्षक बिबट्या (Leopard) जेरबंद केल्याशिवाय गावी परत जाणार नाहीत असे आश्वासन पुण्याहून (Pune) बोलावण्यात आलेल्या राणाज रायफल क्लबचे संचालक डॉ. चंद्रकांत मंडलिक यांनी दिले.
आष्टी (Ashti) तालुक्यातील शेतकरी- शेतमजूर व जनता बिबट्याच्या (Leopard) धास्तीने हवालदिल झालेली आहे. बिबट्याच्या हल्यामध्ये तीन जन मरण पावल्यांची व अनेक गंभीर जखमी झाल्याची घटना जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच घडलेली आहे. यापुर्वी जिल्ह्यात बिबट (Leopard) आढळून येण्याचे प्रकार घडले आहेत. वन विभागाने (Forest Department) अनेक वेळा बिबट्याला सापळा लावून जेरबंद करुन इतर राखीव वनक्षेत्रात सोडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र बिबट्याने मानवावर प्राणघातक हल्ला करण्याचा थरारक प्रकार आष्टी (Ashti) तालुक्यात पहायला मिळाला. यामुळे गुंगारा देणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी आता पुणे (Pune) येथील राणाज रायफल या सामाजिक संघटनेच्या तज्ञ कार्यकर्त्यांना पाचारण करण्यात आले आहे. प्रशासनाकडून आज पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील सर्व सरपंचाची बैठक घेण्यात आली. यावेळी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते रानाज रायफल क्लबची संचालक डॉ. चंद्रकांत मंडलिक यावेळी बोलताना म्हणाले की, बिबट हा प्राणी शेतकऱ्यांचा मित्र आहे. रानडुकरांना फस्त करण्याचे मोठे काम तो करत असतो. निसर्ग नियमाप्रमाणे तो रहातो. कदाचित एखाद्या बिबटया चे सुळे तुटले तर तो मोठे भक्ष्य धरत नाही. त्यावेळी लहान मुले, लहान जनावरे अन्न म्हणून शोधतात. मी जुन्नर भागात २०-२५ बिबटे पकडलेले आहेत. या एका आठवड्यात आम्ही वनविभागाला (Forest Department) मदत करून हा नरभक्षक बिबट्या जेरबंद केल्याशिवाय गावी जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी एकेकट्याने रात्री फिरू नये. हातात काठी, मफलर गळ्याला गुंडाळून दोन तीन जणांनी समूहाने शेतात जावे अशी काळजी घेण्याचे आव्हान ही त्यांनी केले. यावेळी गट विकास अधिकारी सुधाकर मुंडे, सभापती बद्रीनाथ जगताप, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे, सरपचं परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ, सुधीर पठाडे उपस्थित होते. दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यामधील मयतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपये अर्थसाह्य मंजूर करण्याची मागणी सरपंच परिषदेच्या वतीने शंभर सरपंचांनी जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे केली आहे.