एक जुलैला भारतातून कोरोना संपणार; अमेरिकास्थित डॉक्टरचा दावा.

मुंबई दि.27 मे – एक जुलैला भारतातून कोरोना संपणार, मात्र आपण सांगितलेल्या पाच गोष्टींची अंमलबजावणी करावी लागेल. लोकांना मास्कचा वापर करावा लागणार नाही आणि तिसऱ्या लाटेचा (Third wave of corona) काही धोका नाही असा दावा भारतीय वंशाचे अमेरिकेतील (US America) पेनिसेल्वेनियात डॉक्टर असलेल्या रवी गोडसेंनी (Dr. Ravi Godse) केला आहे.
(Corona to end in India on July 1; US-based doctor claims.)
अमेरिकास्थित (US America) डॉ. रवी गोडसे हे ख्यातनाम वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. कोरोना संबंधी त्यांनी या आधीही व्हिडीओंच्या माध्यमातून अनेक सूचना केल्या आहेत. आता त्यांनी भारत सरकारसाठी पाच सूचना केल्या आहेत. त्यांचं जर पालन केलं तर येत्या 1 जुलैपर्यंत भारतातील कोरोना संपणार, ऑक्टोबरपर्यंत लोकांनी मास्क वापरायची गरज भासणार नाही तर भारतात कोरोनाची तिसरी लाटच येणार नाही असा दावा त्यांनी केला आहे.
अशा आहेत डॉ. रवी गोडसे यांनी केलेल्या पाच सूचना.
1. दररोज पत्रकार परिषद घेऊन जनतेला कोरोनाबद्दल अधिकृत माहिती द्या.
2. जेवढ्या काही लसी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत त्या सर्वांच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्या.
3. लसीकरण (Vacccination) असेल वा कोरोनाचे उपचार, खासगी क्षेत्रालाही त्याची परवानगी द्या. त्यामुळे गती वाढेल.
4. प्रोटोकॉलनुसार मोनोक्लोनल प्रक्रियेला परवानगी द्या. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होईल. अमेरिकेत मोनोक्लोनलला गेल्या वर्षीच परवानगी देण्यात आली आहे.
5. लाल फितीचा कारभार बंद करा आणि सर्वांचं लसीकरण (Vacccination) करा.
जर मी या दिलेल्या तारखा खोट्या ठरवायच्या नसतील तर या सूचनांचं लगेच पालन करा असंही डॉ. रवी गोडसे म्हणाले.
लहान मुलांना धोका?
देशभर कोरोनाची तिसरी लाट (Third wave of corona) येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि त्यामध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचं सांगण्यात येतंय. यावर डॉ. रवी गोडसे (Dr. Ravi Godse) म्हणाले की, “जरी तिसरी लाट आली नाही तरी लहान मुलांना थोडासा धोका आहेच. आतापर्यंत घरी बसलेली मुलं अचानक ग्राऊंडवर खेळायला गेली तर त्यांना कमी असेना पण काही प्रमाणात धोका आहे.”