आई वडीलानंतर दोन मुलांचा मृत्यू; येवले कुटूंबावर अवघ्या 17 दिवसात काळाचा घाला.

मुक्ताईनगर दि.7 – एकाच कुटुंबातील चौघा जणांचा अवघ्या सतरा दिवसात अंत झाला. पाच-पाच दिवसांच्या अंतराने येवले कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर येवलेंच्या घराजवळील काही शेजारी कुटुंबांनी कोरोनाच्या धास्तीने थेट जंगलातच संसार थाटला आहे.
(Death of two children after mother and father; In just 17 days, the Yeola family was devastated.)
कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. राज्यात दररोज रुग्ण वाढीचे व कोरोना मृत्यूचे (Corona death) नवनवीन विक्रमी आकडे येत आहेत. विशेष म्हणजे मृत्यूची संख्या अधिक आहेत. या मृत्यूत अख्खे कुटूंब उध्वस्त होण्याच्या घटनाही समोर येत आहेत. पुण्याच्या जाधव कुटूंबियातील पाच सदस्य दगावल्याची घटना गेल्याच महिन्यात समोर आली होती. या पाठोपाठ जळगाव जिल्ह्यातील येवले कुटूंबांची घटना समोर आली आहे.
मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील काकोडा गावात 17 दिवसात कोरोनामुळे (Corona death) एकाच कुटुंबातील चौघांचा एकामागून एक बळी गेल्याची घटना समोर आली आहे. आई वडील आणि दोन मुलांचा यात समावेश आहे. आधी आई-वडिलांवर काळाने घाला घातला, त्यानंतर धाकटा भाऊ गेला. तर अखेर मोठ्या भावाचाही जळगावच्या कोविड सेंटर गोदावरी रुग्णालयात मृत्यू झाला.
काकोडा गावातील अहिल्याबाई होळकर नगरातील रत्नमाला येवले यांचा दिनांक 17 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पती रमेश येवले यांचीही प्राणज्योत मालवली. आई वडिलांची चितेची आग शांत होत नाही, तोवर दोन्ही मुलांचाही दुर्दैवी अंत झाला. आधी रवींद्र येवले आणि नंतर मोठा मुलगा चंद्रकांत येवले याचाही पाच दिवसाच्या अंतराने मृत्यू झाला.
दोन्ही मुलांच्या पश्चात पत्नी आणि मुलं आहेत. एका भावाला दोन मुले आणि एक मुलगी, तर दुसऱ्या भावाला एक मुलगा आणि एक मुलगी. घरची जबाबदारी आता या दोन्ही महिलांवर आली आहे. कोरोना संसर्गाच्या (Corona Infection) या काळात दोन्ही महिला आपापल्या माहेरी मुलाबाळांना घेऊन गेल्या आहेत.
कष्टकरी कुटुंब म्हणून ओळख असलेल्या येवले कुटूंबात एक मुलगा गाव खेड्यांमध्ये गोळ्या बिस्कीट विकत होता तर दुसरा मातीकामाला जात होता. मेहनतीच्या बळावर यांनी कुटुंबाच्या विकासासाठी स्वप्न पाहिले होते, मात्र ही स्वप्नं त्यांच्या निधनाने विरुन गेली. येवले कुटूंबावर कोसळलेल्या दुखामुळे हळहळ व्यक्त होत आहे.