लवकरच सुटणार धारुरकरांचा हा प्रश्न…. इतर कामांनाही मिळणार गती

किल्लेधारूर दि.१ फेब्रुवारी – शहराजवळ असलेल्या घाट रस्त्याचे लवकरच रुंदीकरण व सरळीकरण होणार असून यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. यासोबतच इतर प्रलंबित विकास कामांनाही गती मिळणार असल्याची माहिती आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धारुर (Dharur) शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी खामगाव ते सांगोला रस्त्याचे काम पुर्ण झालेले आहे. परंतू शहराजवळच असलेल्या घाट (Ghat) रस्त्याला केंद्रीय रस्ते विकास महामंडळाने फाटा देत काम पूर्ण केल्यामुळे हा घाट अपघाताला निमंत्रण ठरत आहे. अरुंद रस्ता व अवघड वळणामुळे सारखे अपघात होत असल्यामुळे  याबाबत अनेक आंदोलन करत सतत रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न नागरीकांनी लावून धरला होता. सततच्या पाठपुराव्यानंतर आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांच्या प्रयत्नांतून घाटाच्या (Ghat) रुंदीकरण व सरळीकरणासाठी ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यासोबतच तालुक्यातील नरेगाच्या १५५९ प्रलंबित कामासाठी ९६ कोटी ४१ लाख रुपये उपलब्ध झाली आहेत. तालुक्यातील निराधार योजनेतील मंजूर लाभार्थ्यांसाठी निधी उपलब्ध करुन घेण्यात आला आहे. तहसील पातळी वरील शेतरस्त्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुचना देत आयुष्यमान भारत योजना गतीने राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पीएम किसान योजनेत धारुर (Dharur) तालुक्यातील २५ हजार २०० शेतकरी लाभ घेत असून उर्वरित शेतकऱ्यांनी याचा लाभ मिळावा यासाठी गाव पातळीवर चावडी वाचन घेण्याची सुचना केल्याचे आ. सोळंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!