पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांचा पलटवार; पहा काय म्हणाल्या पंकजा…

बीड दि.15 अॉक्टोंबर – भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा (Dussehra festival) सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर आयोजित करण्यात आला होता. प्रशासनानं नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी धडाकेबाज भाषण करत नाव न घेता धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टिका केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून मंत्री धनंजय मुंडे यांनी पलटवार केला आहे.
(Dhananjay Munde’s response to Pankaja Munde’s statement; See what Pankaja said …)
काय म्हणाल्या पंकजा मुंडे
आज झालेल्या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं. आजचा सोहळा खूप देखणा आहे, देशात असा सोहळा कुठे होत नसेल, असं म्हणाल्या. पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने भगवानगडावर दाखल झाल्या होत्या. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मी हेलिकॉप्टरमधून भगवान बाबांवर फुलं टाकत होते. तसेच, मी तुमच्या पायावरही फुलं टाकत होते. कोणत्या नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी फुलं टाकत नव्हते, तर भगवानदादांसाठी आणि तुमच्यासाठी वाहत होते, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आजची दसऱ्याची भक्ती आणि शक्तीची जी परंपरा कायम ठेवण्यासाठी तुम्ही घरची पुरणपोळी सोडून इथे आले आहात, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पंकजा मुंडे मेळाव्यात बोलताना म्हणाल्या की, “आपण जिथे जन्म घेतला त्या मातीचा, जातीचा आपल्याला कधी कमीपणा वाटू देऊ नका, अशी गोपीनाथ मुंडेंची (Gopinath Munde) शिकवण आहे. राजघराणं असो किंवा वंचितांमध्ये जन्म झालेला असो लाज वाटली नाही पाहिजे. आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे त्यासाठी ही परंपरा उभी केली आहे. कोणत्या पक्षाचं, मतांचं राजकारण नाही, तर सामान्यांची चळवळ येथून उठत आहे, जी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाते.” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. माझ्यामागे मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवानबाबांची मूर्ती आहे. हे अत्यंत पवित्र स्थान आहे. या स्थानावर उच्चार करायचा नाही, असा कुठलाही शब्द मी उच्चारणार नाही. या स्थानावर ज्या व्यक्तीचा उल्लेख केल्यानं भगवान बाबांची मान खाली जाईल, अशा कुठल्याही व्यक्तीचा मला उल्लेख करायचा नाही. अशा कुठल्या प्रवृत्तीचाही मला उल्लेख करायचा नाही.”
आपलं मंत्रिपद यांनी किरायानं दिलं : पंकजा मुंडे
“आपलं मंत्रिपद यांनी किरायाने दिलं. आमचं म्हणणे आहे तुम्ही चागंलं, जनतेच्या हिताचं काम करा आम्ही जाहीरपणे तुमचे अभिनंदन करु. पण सध्या राज्यात चाललंय काय? राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. महिलांवर अत्याचर, बलात्कार होत आहे. महिलांकडे वाकडी नजर करुन जरी पाहिलं तर डोळे काढून घेणाऱ्याची ही भूमी आहे. हत्तीच्या पायाखाली दिलं पाहिजे. राज्यात काय चाललंय काय? त्यावर बोलायचं नाही. आरोपींवर बोलायचं नाही. सरकार जर असं काम करत असेल तर जाब विचारायचा की नाही?”, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी जाब विचारला.
धनंजय मुंडे यांचा पलटवार
भाजप नेत्या (BJP Leader) यांनी सावरगावात भगवान गडावर धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही नाव न घेता टीका केली होती. त्यांच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पंकजा मुंडे या स्वत: पाच वर्ष बीड (Beed) जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. त्यामुळे मंत्रिपद भाड्याने देणं, अशा पद्धतीने आरोप करणं हा एक केविलवाणा प्रकार आहे. जनतेला माहिती आहे, दोन वर्षात एवढी संकटं असताना मंत्री (Minister) म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून काय काम करतोय. त्यामुळे त्यांना काय म्हणावं हे त्यांचा प्रश्न आहे, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला.