धारुरच्या ‘त्या’ गंभीर जखमीचे उपचारा दरम्यान निधन… खूनाचा गुन्हा

आज पहाटे कारवाई करत ४ आरोपीना अटक

किल्लेधारूर दि.२२ (वार्ताहर) तालुक्यातील चोंडी येथे मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या मालूराम मुंडे यांचा उपचारादरम्यान सोलापूर येथे मृत्यू झाला यामुळे धारूर पोलीस स्टेशनमध्ये यातील आरोपी वर कलम ३०२ वाढवून खूनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पहाटे यातील आणखी ४ आरोपी पोलिसांनी जेरबंद केली आहेत.

अपहरणाचा गुन्हा दाखल केला म्हणून फिर्यादी व त्यांच्या वडिलास काठ्या कुऱ्हाडीने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील चोंडी येथे घडली असून या घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी आठ जना विरूध्द धारूर पोलीस (Police) स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील घटना १५ डिंसेबर रोजी घडली. फिर्यादी अशोक मालूराम मुंडे यांचे घरा समोर आरोपी विलास आण्णा मुंडे व इतर सात जन रात्री आठच्या वेळी घरा समोर येऊन तुम्ही सांगोला पोलीस (Police) स्टेशनला आमचे विरूध्द अपहरणाचा गुन्हा का दाखल केला म्हणून विचारणा केली. मालूराम मुंडे व घरातील व्यक्ती समजूत काढत असताना आरोपींनी काठ्या, कुऱ्हाडी व इतर हत्याराने मारहाण केली. या मारहाणीत मालूराम मुंडे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल उपचारा दरम्यान त्यांचा सोलापूर रुग्णालयात मृत्यू झाला. फिर्यादी अशोक मुंडे त्यांने दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी विलास आण्णा मुंडे सह आठ जना विरूध्द गु.र.न., ३२८/२०२० नुसार कलम ३०७, ३२५, ३२३, १४३, १४७, १४८ कलमा सह गुन्हा दाखल करण्यात आला होता. जखमी च्या मृत्यू नंतर खूनाचा (Murder) ३०२ हे कलम वाढवण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस (Police) उपनिरीक्षक प्रदीप डोलारे हे करत आहेत. गुन्ह्यातील सहा आरोपी अटक करण्यात आली असून पोलीसाचे पथक इतर दोन आरोपीचा शोध घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!