जिल्ह्यातील ३०० वा बळी धारुरचा… तालुक्यात १७ कोरोना बळी….

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) शहरातील ८३ वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचे अंबाजोगाई येथे उपचार सुरु असताना आज पहाटे निधन झाले. जिल्ह्यातला ३०० वा तर धारुरचा हा सतरावा कोरोना (Corona) बळी (Death) ठरला आहे.
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. दि.४ रविवार पर्यंत जिल्ह्यात झालेल्या मृतांचा आकडा २९९ होता. आज धारुरचा एका वृध्दाचे निधन झाल्याने ही संख्या ३०० झाली आहे. तर जिल्ह्या बाहेर दगावलेली संख्या ४ आहे. यामुळे जिल्ह्याची कोरोना बळीची संख्या ३०४ होत आहे. धारुर शहर व तालुक्यातही कोरोना (Corona) पॉझिटीव्ह रुग्ण दगावण्याचे प्रमाणही अधिक आहे. शहरातील एक ८३ वर्षीय वृध्द चौदा दिवसांपुर्वी दि.२३ अंबाजोगाई स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालयात कोरोना पॉझिटीव्ह आल्याने अतिदक्षता कक्षात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्या वर उपचार सुरु असतानाआज दि.५ रोजी पहाटे साडेपाच वाजता त्यांचे निधन झाले. तालुक्यातून कोविड-१९ (Covid-19) लागण होवून मृत (Death) पावणारे ते १७ वे ठरले.