धारूरची डॉक्टर कन्या करणार घाटी रुग्णालयात रुग्णसेवा; आमदार प्रकाश सोळंकेकडून कौतूक.

किल्ले धारूर दि.28 फेब्रुवारी – धारूर (Dharur) तालुक्यातील आम्ला येथील डाॅ. रजनी जनकराव कदम औरंगाबाद (Aurangabad) येथील घाटी रूग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणुन नुकत्याच रूजु झाल्या आहेत. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनीही तिचे कौतूक केले आहे.
( Dharur’s doctor Kanya will provide ambulance service to Ghati Hospital; Appreciation from MLA Prakash Solanke. )
ज्या बीड (Beed) जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी आहे अशा जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या धारूर तालुक्यामधील आम्ला या छोट्या गावातील डाॅ. रजनी जनकराव कदम यांची औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात (Ghati Hospital) स्त्रीरोग तज्ञ (Gynecologist) म्हणुन नियुक्ती झाली आहे. त्या नुकताच आपल्या पदावर रूजू झाल्या आहेत.
धारूर तालुक्यातील डोंगरपट्ट्यात असलेल्या आम्ला येथील माजी सरपंच तथा सेवा सोसायटीचे माजी चेअरमन जनकराव कदम यांची मुलगी डाॅ. रजनी हिने ग्रामीण भागात आम्ला येथे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील उच्चशिक्षण लातुर (Latur) व इतरत्र घेतले. ग्रामीण भागातील मुली गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची टक्केवारी तशी कमीच.
मात्र रजनी हिने प्रथम पासुनच उच्च शिक्षण घेऊन डाॅक्टर होऊन गोरगरिबांची सेवा करण्याचे ध्येय बाळगले होते. तीने बारावीनंतर जिद्दीने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. डाॅक्टर झाल्यानंतर याच विषयात तिने एम.डी. करावी असे आ.प्रकाश दादा सोळंके यांनी सांगत तिचा एम.डी.साठीचा होणारा सर्व खर्च केला.
ग्रामीण भागातील महिलांमध्ये पोटाच्या आजारासह इतर आजार मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे तीने स्त्रीरोग तज्ञ डाॅक्टर होण्याचे ठरवले. यामध्ये एम.डी. केली. बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी आहे. यावर नुकतीच मोठी चर्चा झाली. मात्र रजनीने मुलगी काय करू शकते हे आपल्या यशातून दाखवून दिले. डाॅक्टर होऊन तीने स्वतः सह आपल्या आईवडिलांचे स्वप्न पुर्ण तर केलेच शिवाय आपल्या गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव लौकीक केले.
डाॅ. रजनी हीची नुकतीच औरंगाबाद येथील घाटी शासकीय रूग्णालयात स्त्रीरोग तज्ञ म्हणुन नियुक्ती झाली. याबद्दल डाॅ. रजनी जनकराव कदम हिचे आ.प्रकाश दादा सोळंके यांनी अभिनंदन केले. डॉ. रजनीच्या यशामुळे ग्रामिण भागातील मुलींना प्रेरणा मिळत असून आम्ला या गावात आनंदाचे वातावरण आहे.