पगार मिळत नसल्याने ड्रायव्हरने केले ३ कोटी ३० लाखाचे नुकसान….

मुंबईः दि.२३- पगार न मिळाल्याने ड्रायव्हरने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसात (Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रायव्हरला (Driver) पोलिसांनी ताब्यात घेतले.
बोरिवलीत पाच लक्झरी बसेसला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत या पाचही लक्झरी बसेस जळून खाक झाल्या होत्या. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र तपास केल्यानंतर ड्रायव्हरनेच (Driver) बसेस पेटवल्याचं समोर आलं आहे. एमएचबी पोलिसांनी (Police) बसचा चालक अजय रामपाल सारस्वत याला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी केली असता त्यानेच बसेसला आग लावल्याची कबुली दिली आहे. दरम्यान, अजय रामपाल सारस्वतला पोलिसांनी अटक केली आहे. या पाचही बसेसची किंमत सुमारे ३ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे.