रस्त्यावर ‘बर्निंग ट्रॅव्हल्स’ चा थरार…

जिंतूरःदि८- पुण्याहून हिंगोलीकडे येणाऱ्या खासगी चालत्या ट्रॅव्हल्सने औरंगाबाद जिंतुर (Jintur) महामार्गावरील मानकेश्वर (चारठाणा) पाटीजवळ अचानक पेट घेतल्याची घटना आज सकाळी घडली असून चालकाच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला. रस्त्यावरच ‘बर्निंग ट्रॅव्हल्स’ (Burning Travels) चा थरार अनेकांनी अनुभवला. या बसमध्ये असलेले बारा प्रवाशी सुखरुप असून त्यांचे सामान मात्र बसमध्ये जळून खाक झाले.

पुण्याहून हिंगोलीकडे जाणाऱ्या (क्र.एम एच २० डि. डि.०५२९) खासगी ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला. बसच्या इंजिनला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने आपली बस रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. चालकाच्या चतुराईमुळे मोठी जिवीत हानी टळली. ही घटना सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान घडली. स्थानिक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून अग्नीशमन दलाला बोलावले. अग्निशामक घटनास्थळी पोहचेपर्यंत ट्रॅव्हल्स पूर्ण जळून खाक झाली होती. या बर्निंग ट्रॅव्हल्स (Burning Travels) मधील प्रवासी दिपक गणेश मोरे (वय २१), रा. औढानागनाथ, श्री .मदन, श्री. राठोड (वय २३) रा. कवठेतांडा ता. औढानागनाथ, गणेश अंकुश वाघ (वय २६) ता. जिंतुर, सचिन दादाराव मोरे रा. हिंगोली यांनी आपबिती व्यक्त केली. घटना घडल्यानंतर बऱ्याच उशिराने पोलिस (Police) घटनास्थळी पोहचले. सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत जमादार, फौजदार प्रदिप अल्लापुरकर हे घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला. जिंतूर (Jintur) पोलिस (Police) ठाण्यात जळीतप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!