भूकंपाच्या धक्क्याने मराठवाडा हादरला; नांदेड, हिंगोलीत दहशत.

हिंगोली दि.11 जुलै – जिल्ह्यातील नांदापूर व कुरुंदा परिसरात केंद्रबिंदू असलेल्या भूकंपाचे धक्के यावेळी हिंगोली शहरापर्यंत जाणवले तसेच नांदेड येथेही हा धक्का जाणवला. वसमत, औंढा व कळमनुरी या तीन तालुक्‍यांच्या सीमेवर मागील तीन वर्षांपासून भूगर्भात आवाज येऊन हे भूकंपाचे धक्के (Earthquake shocks) जाणवत आहेत.

(Earthquake shakes Marathwada; Terror in Nanded, Hingoli.)

मात्र, रविवारी सकाळी 8 वाजून 33 मिनिटांनी बसलेला धक्का आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का होता. कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, पोत्रा, वारंगा फाटा, दांडेगाव, जवळा पांचाळ, वडगाव, रेडगाव या परिसरात हे धक्के जाणवले. सांडस परिसरातही दोनदा आवाज झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. भूगर्भातून मेघगर्जनेसारखा आवाजही आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

वसमत शहरासह तालुक्यातील पांगरा शिंदे, कवठा, कुरुंदा, बोराळा, खुदनापूर, किनोळा, बोरगाव या परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. याबाबत तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लातूर येथील भूकंप मापक केंद्राशी (Earthquake Measurement Center) संपर्क साधला असल्याचे सांगितले. या भूकंपामुळे नुकसानाची नोंद नसून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले.

औंढा तालुक्यातील येळेगाव सोळुंके आणि इतर गावांत भूकंपाचे धक्के (Earthquake shocks) जाणवले आहेत यावेळी पहिल्यांदाच हिंगोली शहरात धक्का जाणवल्याने अनेक जन याबाबत फोनवर विचारना करताना दिसत होते. तसेच नांदेड च्या काही भागातही या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या भूकंपाची रिश्टर स्केलवर (Richter scale) 4.4 ची नोंद झाली असून त्याचाच परिणाम हिंगोली, नांदेड जिल्ह्यात झाला असल्याची प्राथमिक माहिती भूगर्भ शास्त्रज्ञ टी. विजयकुमार यांनी दिली.

यवतमाळमध्ये भुकंपाचा धक्का …
मुडोना आणि साधूनगरमध्ये भूकंपाचं केंद्र
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मुडोना आणि साधूनगर परिसरात या भूकंपाचे केंद्र दाखवले असून त्याची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल (Richter scale) एवढी नोंदवली आहे. केंद्रबिंदूच्या ठिकाणी शेती भूभाग आहे, मात्र आजूबाजूच्या गावांमधील नागरिकांना सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचे महागाव तहसीलदार नामदेव इसळकर यांनी सांगितले. केंद्रबिंदूच्या गावांमध्ये त्यांनी भेट देऊन नागरिकांकडून माहिती घेतली.

आजूबाजूच्या 10 किलोमीटरच्या परिसरातील गावांमध्ये पोलीस पाटलांकडून माहिती घेतली असता कुठेही धक्के जाणवले नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच जीवित व वित्त हानी झालेली नसल्याचेही इसळकर यांनी सांगितले. तरीही आमचं पथक दिवसभर काही घडामोडी झाल्यास परिस्थिती हाताळण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!