माजलगावात रविवारी आठ जणांचा मृत्यू; धारुर तालुक्यातील तीघांचा दुसऱ्या लाटेत मृत्यू.

माजलगाव/किल्लेधारूर दि.18 एप्रिल- कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्ग चांगलाच वाढला असून पुणे, अहमदनगर, औरंगाबाद व नांदेडनंतर बीड जिल्ह्यातही कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) पावणाऱ्यात रुग्णांचा आकडा वाढत आहे. माजलगावात एकाच दिवशी आठ कोरोना बधितांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली तर गेल्या आठवड्यात धारुर तालुक्यातील तीघांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
(Eight killed in Majalgaon on Sunday; Three killed in second wave in Dharur taluka)
राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर टाकणारी ठरत आहे. बीड जिल्ह्यातही दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून आकडा हजाराच्या पुढे गेला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग वाढला आहे. विशेष करुन ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा वाढलेला संसर्ग डोकेदुखी ठरत आहे. वाढलेली रुग्ण संख्येसह मृतांचा आकडाही फुगलेला दिसत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू अंबाजोगाई येथे होत आहेत.
जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातही दररोज 50 ते 60 कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. आज रविवारी माजलगावात सहा कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू (Corona Death) झाल्याची घटना घडली आहे. यात खाजगी कोव्हीड सेंटर वर चार तर ग्रामीण रुग्णालयातील एक, सीसीसी च्या केंद्रात एक रुग्णाने आपले प्राण गमावले आहे. या आठ कोरोना बाधित (Corona Positive) मृतावर शहरातील मंगलनाथ स्मशानभूमीवर अंत्यसंकार करण्यात अले असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, कार्यालयीन अधिक्षक गणेश डोंगरे व पथक प्रमुख संतोष घाडगे यांनी दिली. आज माजलगाव तालुक्यात सर्वाधिक 91 रुग्णाची नोंद झाली आहे.
धारुर तालुक्यातही मृतांची संख्या वाढत आहे. आजपर्यंत तालुक्यात 30 कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात तालुक्यातील सुकळी येथील 40 वर्षीय महिलेसह गांजपुर येथील 60 वर्षीय पुरूषाचा तर काल दि.17 रोजी शिवगणतांडा अंजनडोह येथील 23 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.