सांस्कृतिक

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात विद्युत रोषणाईने उजळणार किल्ला व तहसील.

49 / 100

किल्लेधारूर दि.11 अॉगस्ट – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात किल्ल्यासह तहसील कार्यालयावर विद्युत रोषणाई होणार असून याशिवाय कालपासून विविध कार्यक्रमास सुरुवात झाल्याची माहिती प्रभारी तहसीलदार दत्तात्रय भारस्कर यांनी दिली.
( Electric lighting on the tehsil along with the fort on the occasion of Independence Day. )

संपूर्ण देशभर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यासाठी प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. बुधवार दि.10 रोजी येथील ऐतिहासिक किल्ल्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी तालुका स्तरावरील महसुल, वन, पोलिस, शिक्षण व कृषि विभागासह नगर परिषद अधिकारी, कर्मचारी व विविध शालेय शिक्षण संस्था, धारुर महाविद्यालय, विविध सेवाभावी संस्था, युथ क्लब, कायाकल्प संस्था, सकल मराठा समाज, भ्रष्टाचार निर्मुलन संस्था, एनसीसी छात्र, जनता विद्यालय, मिल्लिया उर्दू विद्यालय, सरस्वती विद्यालय, पत्रकार व नागरीकांनी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, प्रसिद्ध उद्योगपती माधव निर्मळ, राष्ट्रवादीचे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा. इश्वर मुंडे, शहराध्यक्ष नितिन शिनगारे यांनी अभियानास भेट दिली. आजच्या स्वच्छता अभियानात किल्ल्याचा दर्शनी भाग व रस्ता रुंदीकरण करण्यात आले.

धारुर (Dharur) किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व मुरुम टाकुन मजबुतीकरण करण्यात आले. यासाठी नगर परिषद कर्मचारी व शहरातील खाजगी ठेकेदार बापुराव खामकर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी नवयुवक क्रांती गणेश मंडळाचे अमरजीत तिवारी यांनी स्वखर्चातून तणनाशक फवारणी, बाळासाहेब सोनटक्के यांनी सहभागी स्वंयसेवकांना पाणी वाटप तर सकल मराठा व भ्रष्टाचार निर्मुलनकडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. यावेळी तहसीलदार दत्तात्रय भारस्कर, मुख्याधिकारी विशाल पाटील यांनी परिसरात अतिक्रमण करणाऱ्या अतिक्रमणधारकांना तात्काळ अतिक्रमण हटवण्याची सुचना केल्या. पवित्र व ऐतिहासिक किल्ल्यासमोरच सर्रास वराहपालनाचे निवारे उभारण्यात आलेली असल्याने ते तात्काळ काढण्याचे तोंडी आदेश संबंधितांना देण्यात आले. या अभियानात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभाग घेतला.

होणार विद्युत रोषणाई व संगीत रजनी
ऐतिहासिक किल्ल्यात दि.13 रोजी राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात येणार असून सलग तीन दिवस विद्युत रोषणाई व विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. दि.14 रोजी किल्ल्यातील आतील व बाहेरील परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. दि.15 अॉगस्ट रोजी मुख्य ध्वजारोहनानंतर किल्ल्यात संगीत रजनी हा राष्ट्रीय गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त (Independence Day) आयोजित कार्यक्रमात सर्व नागरीकांनी सक्रीय सहभाग घेवून घराघरात तिरंगा लावत कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी तहसीलदार (Tehsildar) दत्तात्रय भारस्कर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!