दशक्रिया विधीसाठी गेलेले एकाच कुटूंबातील 11 जण बुडाले; चौघांचे मृतदेह सापडले.

अमरावती दि.14 सप्टेंबर – अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या वरूड तालुक्यात वर्धा नदीत (Wardha River) श्री क्षेत्र झुंज नजीक नाव उलटून 11 जण बुडाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी 10 वाजता घडली आहे.
(Eleven members of the same family who went for the Dashakriya ritual drowned; The bodies of four were found.)
नावाडी सह चार जणांचे मृतदेह सापडले असून अन्य लोकांचा शोध आहे. दरम्यान गाडेगाव मधील मातरे कुटुंब दशक्रिया विधीला जाण्यासाठी आले असता ही दुर्घटना झाली आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. मृतांमध्ये एका चिमुकलीचा देखील समावेश आहे.
श्री क्षेत्र झुंज येथे नदीपात्रामध्येच एक धबधबा (waterfall) आहे. याचं पर्यटकांना आकर्षण आहे. आज सकाळी महादेव मंदिरामध्ये जाताना एक बोट उलटली आणि एकाच कुटुंबातील 11 जण बुडाले. मागील काही दिवस राज्यात पावसाचे देखील जोर वाढला असल्याने वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे.
बुडालेल्यांमध्ये भाऊ, बहीण, जावई यांचा समावेश आहे. एक महिला आणि लहान मुलीसह तीन मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. पण अद्याप इतर मृतदेहांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
नारायण मातरे (वय 45, रा. गाडेगाव) वंशिका शिवंकर (वय 2, हा. तिवासघाटी) आणि किरण खंडारे (वय 28, रा. मक्खन) यांचे मृतदेह सापडले. तर अश्विनी खंडारे, वृषाली वाघमारे, अतुल वाघमारे, अदिती खंडारे, मोहिनी खंडारे (सर्व राहणार तारासवांगा), निशा मातरे (रा. गडेगाव), पियूष मातरे (रा. गडेगाव) आणि पूनम शिवंकर (रा. तिवासघाटी) या 8 जणांचा शोध लागलेला नाही, असे सांगण्यात आले आहे. बेनोडा पोलिस (Police) घटनास्थळी तैनात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.