आरोग्य विभागात दहा हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीची भरती; कोरोना संकटामूळे प्रस्ताव.

मुंबई दि.17 एप्रिल – कोरोनाच्या संकटातही राज्य सरकारनं सामान्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. राज्यात आरोग्य विभागातील पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अंतर्गत दहा हजार 127 आरोग्य कर्मचाऱ्यांची पदांची भरती होणार आहे. त्यात तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आरोग्य पर्यवेक्षक अशा पाच संवर्गातील पदांची ही भरती (Recruitment) होणार आहे.
(Emergency recruitment of ten thousand 127 health workers in the health department; Proposal due to corona crisis.)
महाराष्ट्रात अगदी छोट्या छोट्या गांवापर्यंत कोरोना विषाणूचा (Corona Virus) संसर्ग वाढला आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यातच त्याच्याशी मुकाबला करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता सध्या जाणवत आहे. त्यासाठी राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त विभागाला पद भरतीबाबत प्रस्ताव सादर केला. त्यात आरोग्य विभागातील (Health Department) पाच संवर्गातील दहा हजार 127 पदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे.
राज्यात कोरोना विषाणू (Corona Virus) संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. सरकारतर्फे त्याला थोपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदे असल्यामुळे यंत्रणेसमोर अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वित्त मंत्रालयाकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. त्यात जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची 10, 127 पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
ग्रामविकास आणि वित्त मंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती (Recruitment) तातडीने सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावावर शासनाकडून प्रभावी हाताळणी व नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने दहा हजार 127 पदे भरण्याबाबत चा प्रस्ताव ग्राम विभाग ग्रामविकास विभागामार्फत वित्त मंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला ग्रामविकास आणि वित्त मंत्र्यांची मान्यता मिळाल्यानंतर पदांची भरती तातडीने सुरू होईल.