अत्यावश्यक सेवेला बीड जिल्ह्यात ब्रेक; वेळेच्या बंधनाची सोमवार पासून अंमलबजावणी.

बीड दि.18 एप्रिल – ‘ब्रेक द चेन’ (Break The Chain) अंतर्गत बीड जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेवरही जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणले असून त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने तसेच भाजी विक्रेते यांना सकाळी 7 ते 11 या वेळेत तर फळ विक्रेत्यांना सांयकाळी 5 ते 7 ची मुभा दिली आहे. या व्यतिरिक्त दुकाने उघडलेली दिसल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
(Emergency service breaks in Beed district; Time constraint implemented from Monday.)
ब्रेक द चेन’ (Break The Chain) अंतर्गत शासनाने 14 एप्रिल बुधवारी रात्री 8 पासून लॉकडाऊन (lockdown) केले आहे. अत्यावश्यक सेवा (Essential services) वगळून अन्य दुकानांना सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे. यानुसार, अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश असलेले किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, औषध दुकाने यांच्यासह बेकरी आदी दुकाने सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन (lockdown) अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असल्याने ही दुकानेही ठराविक वेळेनंतर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढलेल्या आदेशानूसार अत्यावश्यक सेवा (Essential services) श्रेणीतील किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटण विक्रीची दुकाने, व बेकरी ई. दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच केवळ हातगाड्यावर फिरुन फळांची विक्री सांयकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत करता येईल. या आदेशाची अंमलबजावणी सोमवार दि.19 पासून होणार आहे.
औषधांची दुकाने वगळता अन्य दुकानांना बंदी घालण्यात आल्याने काही प्रमाणात रस्त्यावर होणारी गर्दी कमी होणार आहे. सर्वात जास्त परिणाम रस्त्यावरील भाजी व फळ विक्रेत्यामूळे होणार आहे. या निर्णयाची व्यापाऱ्यांमधून पुन्हा तीव्र नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे. किमान किराणा, दूध, भाजीपाला आदी अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची मागणी केली जावू शकते.