मुदत संपत आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाना कालावधी वाढून द्यावा-आ. सुरेश धस

आष्टी दि.१ (प्रतिनिधी)- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच जागतीक आरोग्य संघटनेने WHO सांगितल्याप्रमाणे आणि राज्याचे उपमुख्यमंञी यांनी देखील कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता राज्यातील मुदत संपत असलेल्या जवळपास ६५ नगरपंचायतींवर जर प्रशासक नेमण्यात आले तर यामध्ये गावपातळीवर आरोग्य विषयक उपाययोजना राबविताना अडचणी निर्माण होतील अशा परिस्थीतीत या मुदत संपत असलेल्या नगरपंचायत, नगरपरिषदांचा तीन महिन्यांचा कालावधी वाढविण्यात यावा अशी मागणी आ.सुरेश धस Suresh Dhas यांनी केली आहे.आ

राज्यातील ६५ नगरपंचायत, नगरपरिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्था यांची मुदत संपत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी  कोरोना या महामारीची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुदत संपत असलेल्या नगरपंचायत, नगरपरिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थावर प्रशासक नेमले आणि कोरोनाची दुसऱ्यांदा लाट आली तर या भयंकर आजारावर तसेच इतर अनेक बाबीवर एकटे प्रशासक मार्ग काढू शकत नाहीत. यामुळे अनेक अडचणी निर्माण होतील. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक या प्रक्रियेतुन पूर्णता बाहेर पडले तर लोकांचे प्रचंड हाल होतील अशी शक्यता आहे. राज्य शासनाने निवडणूक आयोगाला बोलून नगरपंचायत, नगरपरिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना किमान तीन महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी भाजपाचे आ.सुरेश धस Suresh Dhas यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!