कोरोना मृत्यू… 50 हजार रुपयांची आर्थिक मदत; आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांचा मोठा खुलासा.

मुंबई दि.27 नोव्हेंबर – कोरोनामुळे मृत्यूमुखी (Corona Death) पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यभरात समाधानाचे वातावरण आहे. मात्र, ही मदत नक्की कुणाला मिळणार यासंदर्भात आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी मोठा खुलासा केला आहे.
(Corona’s death … financial assistance of 50 thousand rupees; Health Minister Dr. Rajesh Tope’s big revelation.)
राज्य शासनाने मदतीची रक्कम लाभार्थींच्या थेट बँक खात्यात (Bank account) जमा करण्याकरिता ही योजना तयार केली आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना मदतीची रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे. महाराष्ट्र (Maharahstra) राज्यात जी व्यक्ती कोव्हिड-19 (Covid-19) या आजारामुळे निधन पावली आहे तसेच जर त्या व्यक्तीने कोव्हिड-19 चे निदान झाल्यामुळे जरी आत्महत्या (suicide) केली असेल तरी त्या मृत व्यक्तीच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- (रु. पन्नास हजार) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत्त निधीमधून देण्यात येणार आहे.
सानुग्रह सहाय्य देण्याकरिता कोव्हिड -19 मृत्यू प्रकरणे निर्धारित करण्यासाठी पडताळणी करण्यात येईल. पडताळणीसाठी विविध मुद्दे शासन निर्णयात सविस्तरपणे देण्यात आलेले आहेत. ही मदत मिळण्यासाठी कोव्हिड-19 या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटच्या नातेईवाईकाने राज्य शासनाने या करिता विकसित केलेल्या वेब पोर्टलवर (Web portal) ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जदार स्वत: किंवा सेतू केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत CSC-SPV मधून अर्ज करु शकेल.
या कामासाठी नव्याने वेब पोर्टल पुढील आठवड्यातच विकसित करण्यात येणार आहे. त्या वेब पोर्टलवर ऑनलाईन (Online application) अर्ज कसा करावा तसेच संपूर्ण या योजनेची तपशीलवार कार्यपध्दतीची माहिती असेल. हे वेब पोर्टल कार्यान्वित झाल्यानंतर सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे याबाबत आपल्या स्तरावर याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी तसेच याबाबत प्रसिद्धी करावी. जिल्हा तसेच तालुका व गाव पातळीवर देतील आणि सर्व संबंधितांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने करावे. याबाबतचा महसूल व वन विभागाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.
आरोग्यमंत्री (Health Minister) डॉ. राजेश टोपे म्हणाले की, पैसे फक्त खात्यातच जमा करण्यात येतील, तशी अट राहील. संबंधित व्यक्तीचा कोरोनाचे निदान झाल्यानंतर महिन्याभरात (30 दिवसाच्या आत) मृत्यू झाला असल्यासच मदतीस पात्र राहणार आहे. मृत्यू दाखल्यात कोरोना मृत्यू नोंद नाही. असे असले तरीही अटींची पूर्तता होत असल्यास 50 हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याचे डॉ. राजेश टोपे यांनी सांगितले आहे.