पिकांच्या नुकसानीचे शेतकऱ्यांनी आनलाईन नोंदणी करावी- आ. प्रकाशदादा सोळंके

किल्लेधारूर दि.१७(वार्ताहर) सध्या माजलगाव मतदारसंघातील माजलगाव, धारुर व वडवणी तालुक्यात अनेक गावांत अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असुन अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तालुका विमा प्रतिनिधी व कृषि कार्यालयात संपर्क करुन अॉनलाईन नोंदणीद्वारे तक्रार नोंदवण्याचे आवाहन आ.प्रकाशदादा सोळंके यांनी केले आहे.

गेल्या पाच सहा दिवसात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस झालेला आहे. या पावसात खरीप हंगामातील पिकांचे कापुस, पिवळी, बाजरी व काही प्रमाणात सोयाबीनचे व अनेक फळबागांचे नुकसान झालेले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांचे काढणी झालेल्या पिकांचेही नुकसान झालेले आहे. माजलगाव, वडवणी व धारुर तालुक्यातील ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ॲग्रिकल्चर इन्सुरंस कंपनीकडे विमा उतरवला आहे त्यांनी आपल्या नुकसानीची नोंदणी अॉनलाईन करावी किंवा तालुका विमा प्रतिनिधी व तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा असे आवाहन आ. प्रकाशदादा सोळंके यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!