किल्लेधारूर दि.17 अॉगस्ट – Farmers Suicide तालुक्यातील कोळपि़प्री येथील शेतकरी नृसिंह नारायण सांवत वय 50 वर्ष यांनी शेतीचे कर्ज झाल्याने शेतातील लिंबाचे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
तालूक्यातील कोळपिंप्री येथील शेतकरी नृसिंह नारायण सांवत (वय 50 वर्ष) यांचेकडे धारूर येथील पेठ विभागातील एस बी आय व कोळपिंप्री सेवा सहकारी सोसायटी यांचे पिक कर्ज होते. शेतीत दिवसराञ मेहनत करून ही कर्ज फिटत नसल्याने नृसिंह सांवत या शेतकऱ्याने जीवनास कंटाळून खोडस रोड वरील आपले शेतात लिंबाचे झाडाला गळफास घेऊन शुक्रवारी 16 आगस्ट रोजी दुपारी आत्महत्या कली. त्यांते पश्चात पत्नी दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या तरूण शेतकऱ्याच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. धारूर पोलीस स्टेशन मध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.