अखेर लॉकडाऊन जाहिर; उद्या रात्री आठ पासून राज्यात कडक निर्बंध. पहा काय आहे घोषणा.

मुंबई दि.13 एप्रिल – महाराष्ट्रातील वाढता कोरोना उद्रेक पाहता लॉकडाऊन (lockdown) लावण्याचा सुतोवाच करण्यात येत होता. अखेर आज फेसबुक लाईव्ह (facebook live) च्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) रात्री 8:30 वाजता जनतेशी संवाद साधत लॉकडाऊनची घोषणा केली. आज मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री यांनी यापूर्वीच लोकांना लॉकडाऊनचे संकेत दिले होते. उद्यापासून पंधरा दिवसांसाठी रात्री आठ पासुन राज्यात कलम 144 कलम लागु करत संचारबंदी व निर्बंध लागु होत आहे.
(Finally announced the lockdown; Strict restrictions in the state from 8 pm tomorrow. See what the announcement is.)
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Udhav Thakre) यांनी जनतेशी फेसबुक लाईव्हच्या (facebook live) माध्यमातून संवादाची सुरुवात पाडव्याच्या शुभेच्छा देवून केली. गतवर्षी पाडव्याला पुढचं वर्ष कोविडमुक्त साजरा करण्याची प्रार्थना केली होती. मात्र यावर्षी पुन्हा कोविडची भयावह स्थिती असल्याचे ते म्हणाले. आपण दहावी, बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या मात्र आपलीच परिक्षा सुरु आहे. आणि ही परिक्षा आपल्याला उत्तीर्ण व्हावेच लागेल असं सांगितले. वेळ निघून गेल्यास अवस्था बिकट होईल अशी भिती व्यक्त केली. पुढे बोलताना राज्याची स्थिती व त्यावर उपाय करण्यासाठीची तयारी कशी असेल यावर त्यांनी भाष्य केले.
सर्व राजकीय पक्षांना विनंती करत उणेदुणे काढू नका असे आवाहन केले. नाविलाजाने निर्बंध लावण्याची वेळ आल्याचे सांगत चर्चेत आणि विचारविनिमयात एक महिना गेला. रोजीरोटी म्हत्वाची आहे पण जीव वाचवणे गरजेचे आहेत. यामुळे उद्या रात्री 8 वाजल्यापासुन निर्बंध लावले जात आहेत. यातुन फक्त पंढरपूर मतदारसंघात शिथिलता देवून मतदानानतर निर्बंधाची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगत सहकार्याचे आवाहन केले.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन (lockdown) घोषित केला. त्याचं प्राथमिक स्वरूप असा असेल…
1. महाराष्ट्र राज्यात उद्यापासून संपुर्ण संचारबंदी. 144 कलम पंधरा दिवसांसाठी लागू.
2.कामाशिवाय बाहेर पडता येणार नाही.
3.सकाळी सात ते रात्री आठ अत्यावश्यक सेवा सुरु
4. अत्यावश्यक सेवा सुरु व अत्यावश्यक सेवेसाठी बस लोकल प्रवासी वाहतूक सुरु.
5. अत्यावश्यक सेवेची वाहतूक सुरु.
6. पाळीव प्राण्यांची आवश्यक दुकाने सुरु
7.बँका, पेट्रोल पंप, सुरु राहणार
8.अधिस्विकृतिधारक पत्रकारांना मुभा
9.रस्त्यावर खाद्य पदार्थ विक्रेत्यांना पार्सल सेवेची परवानगी
10. उत्पादन सेवेतील उद्योग सुरु राहतील.
11. गरीबांना 3 किलो गहु एक किलो तांदूळ प्रति व्यक्ती देणार.
12. शिवभोजन थाळी मोफत देणार.
13. विविध योजनातील अनुदान प्रत्येकी 1 हजार आगाऊ देणार.
14. बांधकाम मजुरांना व नोंदणीकृत घरगुती कामकारांना आर्थिक मदत.
15. अधिकृत फेरीवाल्यांना दिड हजार रुपये देणार
16. अधिकृत रिक्षाचालकांना दिड हजार रुपयांची मदत.
17. अधिवासी कुटूंबाना 2 हजार मदत.
महाराष्ट्रात लावण्यात येत असलेल्या कडक निर्बंधात अर्थात लॉकडाऊन मध्ये प्राथमिक स्वरुपात वरीलप्रमाणे निर्बंध नागरिकांवर लादण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादानंतर नेमकं लॉकडाऊन मध्ये काय काय असणार यांच्या मार्गदर्शक सुचना अधिकृत जाहिर करण्यात येणार आहेत. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे.