भोजन व्यवस्था चालवण्यावरून दोन गटात राडा….

किल्लेधारूर दि.१७(वार्ताहर) जि.प. शिक्षण (Education) विभागाकडून ऊसतोड मजुरांच्या पाल्यासाठी सुरु करण्यात येणारी हंगामी वस्तीगृह व भोजन व्यवस्था ग्रामीण भागात वादाचा विषय ठरत असून तालुक्यात अशाच वादातून दोन गटात तुफान राडा होवून प्रकरण पोलिसांपर्यंत (Police) गेल्याची घटना घडली.

जिल्ह्यातील ऊसतोडणीसाठी साखर कारखान्यावर स्थलांतर करणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी त्या-त्या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये हंगामी वस्तीगृह व स्वतंत्र भोजन व्यवस्था सुरू करण्यात येते. सदरील निवास व भोजन व्यवस्था हे भ्रष्टाचाराचे कुरण ठरत असल्याचे अनेक वेळा सिध्द झाले आहे. या भोजन व्यवस्था चालवण्याच्या कारणावरून सतत वाद होण्याचे प्रकार घडत असतात. तालुक्यातील आसरडोह येथे भोजन व्यवस्था चालवण्या वरून दोन गटामध्ये तुंबळ मारामारी झाल्याची घटना घडली. सेवा सोसायटीच्या आजी-माजी चेअरमन (chairman) मध्ये हा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. मारामारी नंतर दोघांनीही परस्परविरोधी धारुर पोलिसात गुन्हे दाखल केले आहेत. शालेय शिक्षण (Education) समितीच्या माध्यमातून ऊसतोडणी साठी गेलेल्या मजुरांच्या मुलांना भोजन व्यवस्था सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये तालूक्यातील काही शालेय शिक्षण समितीची मुदत संपलेली आहे परंतु प्रशासनाने कोरोना काळात नव्याने निवडणुका टाळण्यासाठी आहे त्याच अध्यक्षांना पुढील कारभार करण्याची मुभा दिली आहे. यावरूनच आसरडोह येथे दोन गटामध्ये तुंबळ मारामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. सेवा सोसायटीचे माजी चेअरमन आनंद शिंदे आणि विद्यमान चेअरमन (chairman) विश्वनाथ शिंदे या दोघांमध्ये भोजन व्यवस्थे वरून बाचाबाची झाली बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने दोघांनीही परस्पर विरोधी तक्रारी पोलिस (Police) स्टेशनमध्ये दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!