अखेर बीड जिल्ह्यातील शाळा बंद….मात्र दहावी बारावीचे वर्ग राहणार सुरु

बीड दि.२४- औरंगाबाद, जालना पाठोपाठ आता बीड जिल्ह्यातील ५ वी ते ९ वी शाळा व अकरावीचे वर्ग कोरोना (corona) संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १० मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी घेतला आहे. तसा प्रस्ताव बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार (Ajit Kumbhar) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता.
(Finally, schools in Beed district are closed … but 10th and 12th classes will continue)
राज्याच्या अनेक भागात कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर शाळा बंद केल्या जात आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातही या संदर्भात काय निर्णय होतो याकडे सर्वांच्या नजर लागल्या होत्या. चार दिवसापूर्वी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्येच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार (Ajit Kumbhar) यांनी आम्ही शाळां संदर्भात निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आज जिल्ह्यातील दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व माध्यमांच्या सर्व शाळा तात्पुरते स्वरूपात बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप (Ravindra Jagtap) यांनी दिले आहेत. ही शाळा बंदी १० मार्च पर्यंत प्रस्तावित करण्यात आली आहे. यापुर्वी मराठवाड्यात औरंगाबाद जालनासह काही जिल्ह्यात शाळा बंदीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.