अखेर परिक्षांचा तिढा सुटला….अॉनलाईन व अॉफलाईन पध्दतीने होणार परिक्षा

मुंबई : दि.२८ – सध्या राज्यात कोरोना रुग्ण वाढीच्या संकटामूळे पालक आणि विद्यार्थ्यांना परिक्षांची चिंता सतावत आहे. नियमित कॉलेज आणि लेक्चर ऑनलाईन होऊ शकले, पण परिक्षा ऑनलाईन होतील का? झाल्या तर कशा होणार? आणि ऑनलाईन नाही तर ऑफलाईन तरी कशा घेतल्या जाणार? असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना सतावत आहेत. जास्तकरून परिक्षा फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या महिन्यांमध्येच होतात. यामुळे आता शिक्षण विभागाला देखील कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे महत्त्वपूर्ण पावले उचलावी लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून (Department of Higher and Technical Education) उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परिक्षांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
(Finally, the exams are over …. The exams will be held online and offline)
‘राज्यात यंदा उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या (Department of Higher and Technical Education) परिक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन (Online and offline) अशा दोन्ही पद्धतींनी घेतल्या जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यासंदर्भात संबंधित विद्यापीठांनी निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे आता विद्यापीठाकडून हे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे दोन्ही पर्याय ऐच्छिक असल्यामुळे परिक्षा ऑनलाईन द्यायची की ऑफलाईन, याचा निर्णय आता विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे’, असे उदय सामंत (Uday Samant) यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ऑफलाईन परिक्षेचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना संदर्भातल्या नियमांचं पालन करूनच परिक्षा देता येणार आहे.
इंजिनिअरिंगच्या परिक्षा अॉनलाईनच
इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या (Engineering and Polytechnic) विद्यार्थ्यांच्या परिक्षा या १०० टक्के ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. त्यानुसार या परिक्षांचं नियोजन केलं जाईल असं उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे राज्यातल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या (Engineering and Polytechnic) विद्यार्थ्यांच्या मनातील परिक्षेबाबतचा गोंधळ काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
शालेय परिक्षांसंदर्भात काय?
बाकी परिक्षांसंदर्भात निर्णय झाला असला तरी शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा कशा घेतल्या जाणार? याबाबत अजून कोणताच निर्णय घेण्यात आला नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या परिक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आता विद्यार्थी आणि पालक करत आहेत.