महाराष्ट्रात फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. ६: दिवाळी साजरी करताना गर्दी टाळा, खबरदारी घेऊन महाराष्ट्रात Maharashtra फटाकेमुक्त दिवाळी Diwali साजरी करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी नागरिकांना केले. सध्या कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी संभाव्य धोका पाहता कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून फिव्हर सर्व्हेलन्स प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे राजेश टोपे Rajesh Tope यांनी काल झालेल्या आरोग्य विभागाच्या बैठकी प्रसंगी सांगितले.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट शक्यतो येणार नाही मात्र संभाव्य लाटेसाठी खबरदारीची उपाययोजना करण्याबाबत काल झालेल्या आरोग्य यंत्रणेच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्या राज्यात कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत त्यात खंड पडणार नसून त्याउलट अधिक प्रभावीपणे ५०० लॅबच्या माध्यमातून चाचण्यांवर अधिक भर दिला जाणार असल्याचे श्री. टोपे Rajesh Tope यांनी सांगितले. आगामी दिवाळी Diwali सण लक्षात घेता नागरिकांनी अधिक खबरदारी बाळगावी. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंग पाळावे, हात सातत्याने धुत रहावे या उपाययोजनांचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास होतो त्यामुळे यावर्षी फटाकेमुक्त दिवाळी Diwali साजरे करण्याचे आवाहन आरोग्मयंत्र्यांनी केले आहे. महाराष्ट्र Maharashtra फटाकेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळासमोर मागणी करणार असल्याचेही श्री. टोपे यांनी सांगितले.