शुक्रवारची संख्या चिंता वाढवणारीच; पुण्याने केले मुंबईला ओव्हरटेक

मुंबई दि.20 मार्च – महाराष्ट्र (Maharashtra) राज्य देशात सर्वाधिक कोरोना बाधित (Corona Positive) रुग्ण आढळून येणारे राज्य ठरत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत यापुर्वीच चिंता व्यक्त करताना राज्याला इशारा दिला आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात 25 हजार 681 नवीन रुग्ण आढळले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 25 हजारावर गेला आहे. तर 14 हजार 400 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत 21 लाख 89 हजार 965 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मुंबईच्या तुलनेत पुण्यातील रुग्णांची संख्या ही जवळपास दुप्पट झाली आहे.

(Friday’s numbers are worrying; Pune overtook Mumbai)

महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचा रिकव्हरी रेट हा 90.42 टक्के इतका आहे. काल दिवसभरात 70 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे 2.20 टक्के इतकं आहे. आतापर्यंत 1 कोटी 80 लाख 83 हजार 977 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 24 लाख 22 हजार 21 जणांना कोरोनाची बाधित (Corona Positive) झाल्याचे समोर आले आहे. पॉझिटिव्हीटी रेट हा 13.39 टक्के इतका आहे. सध्या राज्यात सक्रीय रुग्णांपैकी (Active patients) 8 लाख 67 हजार 333 जण होम क्वारंटाइन आहेत तर 7 हजार 848 रुग्ण हे संस्थांत्मक क्वारंटाइन आहेत.

राज्यात पुणे, मुंबई, नागपूर, नाशिकमध्ये सर्वाधिक सक्रीय रुग्ण (Active patients) आहेत. यामध्ये मुंबईच्या तुलनेत पुण्यातील रुग्णांची संख्या ही जवळपास दुप्पट आहे. पुण्यात सध्या 37 हजार 384 रुग्ण उपचार घेत असून मुंबईत 18 हजार 850 सक्रीय रुग्ण आहेत. पुण्यानंतर नागपूरमध्ये जास्त सक्रीय रुग्ण आहेत. नागपुरात सध्या 25 हजार 861 जण उपचार घेत आहेत. याशिवाय ठाण्यात 16 हजार 735 तर नाशिकमध्ये 11 हजार 867 सक्रीय रुग्ण आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!