लातूर शहरात घराघरात मिळणार पाईपलाईनद्वारे गॅस; मराठवाड्यातील पहिला प्रयोग.

लातूर दि.16 अॉक्टोंबर – लातूर (Latur) शहरात पाईपलाईनद्वारे गॅस देण्याच्या अशोका गॅस एजन्सीजच्या सीएनजी गॅस (CNG Gas) पाईपलाईनच्या भूमिपूजन सोहळा पालकमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या हस्ते पार पडला. पाईपलाईनद्वारे गॅस देण्याच्या व्यवस्थेमुळे या शहरातील उद्योगालाही चालना मिळणार असून लातूरच्या विकासाला आता यामुळे गती मिळेल. औसा तालुक्यात इंधनावर आधारित नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) स्थापन्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.
(Gas through pipeline to households in Latur city; The first experiment in Marathwada.)
महानगरपालिकांतर्गत (Municipal Corporation) औसा रोड येथे अशोका गॅस एजन्सीजच्या सीएनजी गॅस पाईपलाईनच्या भूमिपूजन कार्यक्रम पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते पार पडला. यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, विरोंधी पक्षनेते दिपक सुळ, नगरसेवक अशोक गोविंदपूरकर, ॲड. किरण जाधव यांच्यासह पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, मनपाच्या पुढाकाराने लातूर येथे अशोका गॅसद्वारे घरगुती वापराचा पुरवठा करण्याचा शुभारंभ होत असल्याबद्दल आपल्याला मला आनंद होत आहे. या कार्यासाठी मी मनपाचे अभिनंदन करतो. मराठवाड्यात (Marathwada) लातूर हे पहिलं शहर आहे, जिथे पहिल्यांदा स्वयंपाकाचा गॅस शुभांरभ केलेला आहे.
स्व. विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या “जे-जे नवं, ते-ते लातूर हंव” या ब्रीद वाक्याप्रमाणे लातूरच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत. औसा तालुक्यातील आशिव येथे मदर स्टेशनही (Mother station) सुरु होणार आहे. पाईप नॅचरल गॅस (Natural Gas) इतर वाणिज्य उद्योगासाठीही वापरला जातो. पर्यावरणाला पोषक अशा गॅसची सोय होत आहे. तसेच हा गॅस प्रत्येक घराला उपलब्ध झाला पाहिजे यादृष्टीने मनपाने कामे करावीत असेही पालकमंत्री अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री श्री. देशमुख पुढे बोलतांना म्हणाले की, सामान्य माणसाला समोर ठेवून हॉस्पीटल, रेस्टॉरंट, शाळा, शोरुम, शॉप्स, होम, रेस्टॉरंट यांच्यापर्यंत जलदगतीने पीएनजीने पोहचवावं. गॅसचे नेटवर्क परिणाममकारक ठरावं. सीएनजी / पीएनजी पर्यावरणाला पोषक असणार आहे. लातूर मनपाचा कारभार पारदर्शक आहे त्यांनी कायम सामान्य माणसांची सेवा व्हावी, हाच मुळ दृष्टीकोन समोर ठेवून कार्य करावे असे मत व्यक्त केले.