खुषखबर … मराठवाड्यात निर्बंधात सुट; सहा जिल्हे अनलॉक.

मुंबई दि.19 जून – कोरोना संसर्गाचा (corona infection) सामना करताना ब्रेक दि चैन (Break the chain) अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आली होती. राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या चौकटीतून पाच लेवल ठरवून सुट देण्यात येत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad), जालना, हिंगोली, लातूर, नांदेड तसेच परभणी या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या खाली आल्यामुळे कडक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र मराठवाड्यातील (Marathwada) बीड (Beed) व उस्मानाबाद जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे हे दोन्ही जिल्हे डेंजर झोनमध्येच असून येथील निर्बंध कायम राहणार आहेत.
(Good news … Restrictions in Marathwada; Unlock six districts.)
कोरोनाचा संसर्ग (corona infection) रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात ब्रेक दि चैन (Break the chain) अंतर्गत कडक निर्बंध (restrictions) लावण्यात आले होते. दुसरी लाट ओसरत असल्यामुळे 1 जूनपासून राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. वेगवेगळी लेवल ठरवून जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले हा त्यासाठी निकष ठरवण्यात आला आहे.
प्रत्येक आठवड्याला या निकषानुसार यादी जाहीर करण्यात येत आहे. ज्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांच्या आत आहे तेथील निर्बंध (restrictions) पूर्णपणे हटवण्यास परवानगी आहे, मात्र पाच पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) असेल तर तो जिल्हा डेंजर झोनमध्येच ठेवण्यात येतो. राज्य सरकारने पुढील आठवड्याची यादी जाहीर केली असून त्यानुसार मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad), जालना, परभणी, नांदेड, हिंगोली तसेच लातूर हे जिल्हे निर्बंधमुक्त होणार आहेत. बीड (Beed) व उस्मानाबाद जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity rate) निकषापेक्षा जास्त असल्यामुळे येथे निर्बंध कायम असणार आहेत.
काय सुरू होणार
सर्व प्रकारची दुकाने.
मॉल्स, थिएटर, मल्टिपेक्स, नाट्यगृहे.
रेस्टॉरंट, हॉटेल्स.
सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली
खासगी कार्यालये उघडणार
शासकीय कार्यालये 100 टक्के उपस्थिती
लग्न, अंत्यविधी, बैठकांना बंधन नाही.
जीम, सलून, ब्युटीपार्लर, स्पा सुरू होणार.
जमावबंदी उठवण्यात येणार.
सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट
औरंगाबाद – 2.94 टक्के
जालना – 1.51 टक्के
हिंगोली – 1.93 टक्के
लातूर – 2.55 टक्के
नांदेड – 1.94 टक्के
परभणी – 0.94 टक्के
बीड – 7.11 टक्के
उस्मानाबाद – 5.21 टक्के
सध्याची जिल्हानिहाय कोरोना बाधित व मृत्यू
जिल्हा – संख्या – मृत्यू
औरंगाबाद 130 – 05
जालना 32 – 03
परभणी 49 – 01
नांदेड 26 – 01
हिंगोली 08 – 00
बीड 156 – 04
लातूर 39 – 04
उस्मानाबाद 141 – 02
एकूण 581 – 20