दाट धुक्याने घेतला १३ जणांचा बळी…. भीषण अपघात

जलपाईगुडीः दि.२०- पश्चिम बंगालमध्ये धुक्यामुळे भीषण रस्ता अपघात (Accident) झाला असून यामध्ये १३ जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सदरील घटना मंगळवारी रात्री जलपाईगुडी जिल्ह्यातील धुपगुडी येथे घडली आहे. पोलिसांनी (Police) मदतकार्य सुरु करत जखमींना रुग्णालयात हलवले.
उत्तर भारतात सध्या थंडीची लाट आली सुरु असून त्याचे परिणाम देशाच्या इतर भागातही पहायला मिळत आहेत. तापमानात कमालीची घट झाल्याने पश्चिम बंगालमधील काही भागात पहाटेच्या सुमारास दाट धुकं पहायला मिळत आहेत. यामुळे महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दाट धुक्यामुळे येथे जलपाईगुडी जिल्ह्यात काल रात्री भीषण रस्ता अपघात (Accident) घडला. या अपघातात १३ जणांचा जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिस (Police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील पीडित एका विवाह सोहळ्याला हजेरी लावून घरी परतत होते. एका डंपरने अनेक वाहनांना धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.