बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; शेतीची प्रचंड नुकसान.

बीड दि.31 अॉगस्ट – गेल्या काही दिवसापासूून राज्यातील शेतकरी हा अपुऱ्या पावसामुळे चिंतेत होता. काल हवामान खात्याने (whether department) राज्यात मुसळधार पाऊस (heavy rains) पडण्याचा वर्तवलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला असून राज्यात अनेक भागात रात्री पासून जोरदार पाऊस कोसळत (heavy rain fall) आहे. कालपासून परतलेल्या पावसाने बीड (Beed) जिल्ह्यातही हाहाकार माजवला असून या पावसात शेतीचेही मोठे नुकसान झाल्याचे समोर येत आहे.
(Heavy Rains in Beed district; Huge damage to agriculture.)
राज्यात सर्वत्र पावसामुळे थैमान घातल्याचं दिसतंय. पावसाची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या बीड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कालपासून सुरू असणारा पाऊस आजही चालूचं आहे. बीड जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वाचा असणारा पाऊस आता शेतीचंच नुकसान पोहचवताना दिसतोय.
ओढे, नाले, बंधारे हे तुडूंब भरून वाहत आहेत. धारुर व वडवणी तालुक्यातील सर्व प्रकल्प व तलाव ओसंडून वाहत आहेत. वडवणी तालुक्यातील कुंडलिका धरण ओसंडून वाहत आहे. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पूर आल्याची माहिती समोर येत आहे. आंबेसावळी नदी देखील खळखळून वाहत आहे. बीडच्या बिंदुसरा नदीला कडेपर्यंत पाणी आलं आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात पडत असलेल्या पावसाने पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाल्यांत अडकलेला कचरा काढला नसल्यानं आता पावसाचे पाणी थेट रस्त्यांवर येत आहे. रस्त्यावर देखील पाणी झाल्यानं परिणामी नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
दरम्यान, बीडमधील सिद्धेश्वर बंधारा हा ओव्हरफ्लो झाला आहे. यामुळे बीडच्या नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. गेवराई भागाला पण पावसाने जबरदस्त झोडपलं आहे. गेवराई नदीवर असणारा पुल वाहुन गेल्याची घटना घडली. मध्यरात्री पासून सुरू असणाऱ्या पावसाने शेतातील ऊसाचं खुप नुकसान केलं आहे. अंबाजोगाई व केज परिसरालाही पावसाचा तडाखा बसला असून अनेक शेतातील हाताला आलेले पिक पाण्यात गेले आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद बांधकाम सभापती जयसिंग सोळंके यांनी अप्पर कुंडलिका धरणाला भेट देत पाहणी केली. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनास सतर्कता बाळगण्याच्या सुचना दिल्या आहेत. पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी लवकरच प्रयत्न केले जातील असे सांगितले आहे.