ऐतिहासिक

सर्व काही व्यवस्थित मंग भिंती पडल्या कशा? पुरातत्व खात्याच्या खुलास्यामुळे पडला प्रश्न

किल्लेधारूर दि.२(वार्ताहर) येथील ऐतिहासिक किल्ल्यातील Fort Dharur तीन नवीन बांधलेल्या भिंती पडल्याच्या प्रकरणी आ. प्रकाशदादा सोळंके Prakash Solanke यांनी पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांना मागितलेल्या खुलास्यात सर्वकाही व्यवस्थित असल्याचे दाखवल्यामुळे मंग भिंती पडल्या कशा? असा प्रश्न निर्माण होत असुन पुरातत्व खाते लोकप्रतिनिधींची दिशाभुल करत असल्याचे दिसत आहे.

आगस्ट व सप्टेंबर २०२० मध्ये किल्ल्यात Fort Dharur बांधण्यात आलेल्या नवीन भिंती ढासळल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाल्यानंतर शहरातील काही संघटनांनी प्रशासन व आ. प्रकाशदादा सोळंके यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. आ. प्रकाशदादा सोळंके Prakash Solanke यांच्या माध्यमातून २०१४ मध्ये ऐतिहासिक किल्ल्यात पुरातत्व खात्याने काम सुरु केले होते. याची आठवण करत सकल मराठा, कायाकल्प किल्लेधारूर Fort Dharur युथ क्लब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आ. सोळंके यांना याप्रकरणी तक्रारी केल्या होत्या. आ. सोळंके यांनी राज्याच्या पुरातत्व विभागाच्या औरंगाबाद येथील सहाय्यक संचालक अजित खंदारे यांच्याकडे याबाबत खुलासा मागितला. यात पुरातत्व खात्याकडून खुलासा करत जुन्या मापानुसार भिंतीचे काम करुन आवश्यकतेप्रमाणे भिंतीत माती भरण्यात आल्याचे सांगितले. भिंतीचे काम अंदाजपत्रकानुसार कार्यालयातील कनिष्ठ अभियंता, जतन सहाय्यक व उपअधिक्षक यांच्या पाहणीत बांधकाम साहित्य दर्जा व बांधकामाची गुणवत्ता पुरातत्व संकेतानुसार डिसेंबर २०१७ मध्ये पुर्ण झाल्याचे सांगितले. तसेच हे काम करण्यासाठी सल्लागार म्हणून संचालनालयाने निवड केलेल्या नामिकासुचीतील डि.पी. डिझाईन, औरंगाबाद यांची नेमणूक करण्यात आलेली होती. निविदेनुसार कंत्राटदाराकडून करण्यात आलेल्या जतन व दुरुस्ती कामात कोणत्याही प्रकारचा दोष आढळून आल्यास पाच वर्षापर्यंत कंत्राटदाराची जबाबदारी आहे. याबाबत कंत्राटदारास लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले असुन कंत्राटदाराकडून स्वखर्चातून काम करुन घेतले जाणार आहे. हे काम अधिक गुणवत्तापूर्ण होण्यासाठी पुरातत्व विभाग प्रयत्नशील असल्याचा खुलासा आ. सोळंके Prakash Solanke यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. या खुलास्यात केलेली कामे नियमानुसार व निकषानुसार केल्याचे सांगत देखरेख करणाऱ्या यंत्रणांनी चोख कामगिरी केल्याचे दाखवण्यात आले आहे. मंग भिंती पडल्या कशा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुरातत्व खाते लोकप्रतिनिधींची दिशाभुल करुन दोषींना पाठिशी तर घालत नाही ना असाही प्रश्न इतिहासप्रेमीतून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!