शैक्षणिक

नसता मुख्याध्यापक, शाळाप्रमुख यांच्याविरूद्ध होणार कारवाई… दहावीचा निकाल ठरला.

मुंबई दि.17 जून – विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (TC\LC) नसेल तरी प्रवेश नाकारला जाणार नाही, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केली आहे. यासंबंधीचा शासन आदेशही सरकारने जाहीर केला आहे. दरम्यान सीबीएसईने (CBSE) दहावीचा निकाल 20 जुलैला लागणार असल्याचे जाहिर केले आहे.

(If not, action will be taken against the headmaster and the head of the school.)

शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांत प्रवेश नाकारला जात असल्याचे कळते. केवळ टि.सी. (L.C.\T.C.) नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे अन्यायकारक आहे. याबाबत महाविकास आघाडी सरकारने अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचेही वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी म्हंटले आहे.

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, याची मुख्याध्यापकांनी दक्षता घ्यावी. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिल्यास संबंधित मुख्याध्यापक, शाळाप्रमुख यांच्याविरूद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हंटले आहे.

ठरलं…. या तारखेला लागणार दहावीचा निकाल.
इयत्ता दहावी बोर्डाच्या परिक्षेचा निकाल (Result) 20 जुलैला जाहीर करणार असल्याची घोषणा सीबीएसई (CBSE) बोर्डाने केली आहे. तर बारावीच्या परिक्षेचा निकाल 31 जुलै रोजी लागणार आहे. याबद्दल बोलताना सीबीएसई बोर्डाचे संयम भारद्वाज म्हणाले की, दहावीचा निकाल 20 जुलैला आणि बारावीचा निकाल (Result) 31 जुलैला लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

जेणेकरुन ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी जायचं आहे, त्यांना काही अडचणी यायला नकोत. पुढे त्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबद्दलही माहिती दिली. सीबीएसईने बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठीचे सूत्र जाहीर केले आहे. या सूत्रानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांना गुण दिले जातील. सीबीएसई बोर्डाने आजच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा फॉर्म्युला सर्वोच्च न्यायालयापुढे सादर केला.

40: 30: 30 या फॉर्म्युल्यानुसार आता बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन होणार आहे.
मूल्यमापनाच्या या पद्धतीनुसार, यासाठी तीन प्रकारचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. इयत्ता दहावी मध्ये विद्यार्थ्यांच्या कामगिरीवर 30 टक्के मार्क देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट गुण असलेल्या तीन विषयांचा समावेश करण्यात येईल. त्यानंतर 30 टक्के गुण असतील ते 11 वीच्या अंतिम परिक्षेत केलेल्या कामगिरीवर आधारित आणि उरलेले 40 टक्के गुण हे बारावी इयत्तेत घेतलेल्या चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा आणि सराव (Prelim) परीक्षा यांच्या गुणांच्या आधारावर देण्यात येतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!