महत्वाची बातमी… टीईटी परीक्षा बाबत शासनाचा नवा निर्णय; 10 वी 12 वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार.

पुणे दि.4 जून – शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण झाल्यावर त्याची मुदत 7 वर्षांची होती. या कालावधीत नोकरी न मिळाल्यास पुन्हा टीईटी पास करूनच शिक्षक होण्यासाठी अर्ज करता येत होता. हाच अडसर दूर करून टीईटी परीक्षेची मान्यता आता तहहयात करण्याचा महत्वाचा निर्णय झाला आहे. भावी शिक्षकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
(Important news … Government’s new decision regarding TET exam; There will be 10th and 12th practical exams.)
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल “निशंक’ यांनी गुरुवारी याबाबत घोषणा केली. त्यांनी म्हटले की, हा निर्णय 2011 पासूनच लागू राहणार आहे. म्हणजे 2011 पासूनच टीईटी प्रमाणपत्रांची (TET certificate) वैधता 7 वर्षांनी वाढवून तहहयात करण्यात येत आहे. त्यामुळे पास झालेल्या आणि यापुढेही पास होतील त्यांना पुन्हा ही परीक्षा पुन्हा-पुन्हा द्यावी लागणार नाही.
सीटीईटीचे (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) आयोजन सीबीएसई (CBSE) करीत असून ही परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. पहिल्या पेपरमधील यशस्वी उमेदवारांना पाचवीपर्यंत शिकवता येते. शाळा शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी टीईटी प्रमाणपत्र (TET certificate) आवश्यक आहे.
राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) गतवर्षी ऑक्टोबरमध्ये सीटीईटीची वैधता वाढवून तहहयात करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार निर्णय झाला आहे. त्यामुळे 7 वर्षांचा अवधी पूर्ण झाला आहे त्यांना नव्याने प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश केंद्राने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
10 वी व 12 वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार.
कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता दहावी पाठोपाठ बारावीच्या परीक्षा (12th exam) रद्द करण्यात आल्या आहेत. पण परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश शाळांना देण्यात आलेत. सीबीएसई (CBSE) प्रादेशिक विभागाच्या सूचनेनुसार शाळांना प्रात्यक्षिक परीक्षांच्या गुणांची नोंदणी करायची आहे.
परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी अंतर्गत मुल्यांकनाचे गुण पाठवायचे आहेत. मात्र कोरोनामुळे 50 टक्के शाळांच्या प्रात्यक्षिक परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे शाळांनी आता बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. बारावीच्या परीक्षेच्या (12th exam) प्रतीक्षेत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. पण विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा देण्यासाठी शाळेत जावे लागणार आहे.