शैक्षणिक

शाळा सुरु करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सुचना जारी; 15 जुलै पासून वाजणार शाळेची घंटा.

मुंबई दि.7 जुलै – राज्यातील शाळा (School) सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून कोरोनामुक्त क्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग येत्या 15 जुलै 2021 पासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारने याआधी देखील कोरोनोमुक्त (Corona free) ग्रामीण भागातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी त्या निर्णयला शासनाकडून स्थगिती देण्यात आली होती. शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत शिक्षण विभागाची (education department)   घाई गडबड केल्याचे दिसून आल्याने शासनाने या निर्णयास स्थगिती दिली होती. मात्र आज पुन्हा नव्याने कोरोनामुक्त (Corona free) क्षेत्रातील शाळा सुरु करण्याचा निर्णय देत शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना (Guidelines) जारी केल्या आहेत.

( Issued revised guidelines on starting schools; The school bell will ring from July 15.)

कोरोनामुक्त ग्रामीण क्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यासाठी आधी पालकांशी चर्चा करणे गरजेचे आहे. पालकांशी चर्चा करुन ठराव करावा असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना (Guidelines) दिल्या आहेत त्यांचे पालन करणे गरजेचे आहे. यात खालील मार्गदर्शक सूचनांचा समावेश आहे.

अशा आहेत नवीन मार्गदर्शक सुचना.
– ग्रामपंचायत स्तरावर संरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामसेवक, मुख्यध्यापक आणि केंद्रप्रमुख यांची समिती गठीत करून शाळा सुरु (School) होण्यासाठी चर्चा करावी.

– शाळेत कोणी कोरोनाग्रस्त आढळल्यास शाळा तात्काळ बंद करावी.
– टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करावी. अदला बदलीच्या दिवशी महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य द्यावे.
– शिक्षकांच्या (Teacher) राहण्याची सोय गावातच करावी. शिक्षकांनी सार्वजनिक वाहतूकीचा पर्याय टाळावा.

– वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी बसवावा. दोन बाकांमध्ये 6 फूटांचे अंतर ठेवावे. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी असावेत.
– शाळा सुरु होण्यापूर्वी ‘चला मुलांनो शाळेत चला’ अशी मोहिम शाळेने राबवावी.
– शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
– शाळेत कोरोना सेंटर असल्यास ते एक तिथून दुसऱ्या ठिकाणी हलवावे आणि शाळेचे त्वरित निर्जुंकिकरण करावे.

– शाळेत विलगीकरण केंद्र असल्यास तिथे शाळा भरवणे शक्य नसल्याचे खुल्या परिसरात शाळा भरवावी.
– शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची RTPCR चाचणी करणे अनिवार्य.
– सतत हात साबणाने हात धुणे, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे विद्यार्थी तसेच शिक्षकांना (Teacher) अनिवार्य आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!