शेतकऱ्यांने केली ओढ्यात पाणी सोडून पशूधन व पक्षी प्राण्याची ऐन उन्हाळ्यात सोय

किल्लेधारूर दि.२० (वार्ताहर ) धारूर शहरातील सामाजीक कार्यात अग्रेसर असणारे शेतकरी विजय गायकवाड यांनी भर उन्हाळ्यात शेतातील जवळून जाणाऱ्या ओढ्यात पाणी सोडून येणारे सर्व पशूधन शेळ्या, पक्षी, प्राणी यांचे पिण्याचे पाण्याची सोय केली असून ऐन उन्हाळ्यात पशूदया दाखवण्याच्या त्यांच्या कृत्याचे कौतूक होत आहे.
शहरातील शेतकरी विजय नारायन राव गायकवाड यांचे चिंचपूर रस्त्यावर शेत आहे. या शेताचे परीसरात विवीध जनावरे,पक्षी, प्राणी यांची मोठी ये जा असते. या शेता शेजारी एक ओढा आहे माञ तो उन्हाळ्यात कोरडा पडला आहे. यामुळे मुक्या प्राण्याची पिण्याचे पाण्या साठी फरफट होते. त्यांना पाणी शोधत फिरावे लागते. या प्राणी पक्षी जनावरे यांची भर उन्हाळ्यात पिण्याचे पाणी सुविधा व्हावी म्हणून विजय गायकवाड यांनी ओढ्यात पाणी आपल्या स्वतःच्या विहरी व इंधन विहिरीतून सोडले. यामुळे याभागात फिरणाऱ्या पशु व प्राण्यांची मोठी सोय झाली. गायकवाड यांनी दाखवलेल्या पशूप्रेमामुळे त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.