आजपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर; मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात येलो अलर्ट.

मुंबई दि.16 ऑक्टोबर – नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अर्थातच मान्सूनने महाराष्ट्राचा निरोप (Monsoon) घेतला आहे. गुरुवारी उर्वरित मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातून मान्सून परतला असल्याचं भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केलं आहे. परंतू बंगालच्या उपसागरात (Bay Of Bengol) पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आजपासून चार दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
(Heavy rains in the state from today; Yellow alert in North Maharashtra including Marathwada.)
दोन दिवस आधी महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूनने यावर्षी एक दिवस आधीच महाराष्ट्रात काढता पाय घेतला आहे. राज्यात यावर्षी 4 महिने 9 दिवस पाऊस कोसळला आहे. दरम्यान गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. आजही राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता राहणार आहे.
आजपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर (Rain in Maharashtra) वाढण्याची शक्यता आहे. खरंतर, बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या 48 तासांत ओडिशा राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याचाच परिणाम म्हणून उद्या मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद (Aurangabad), जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर (Latur) या दहा जिल्ह्यांत येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. संबंधित दहा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच आकाशात विजा चमकत असता, घराबाहेर न पडण्याचा किंवा मोठ्या झाडाच्या आडोशाला उभं न राहण्याचा सल्ला भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (Indian Meteorological Department) वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिला आहे.
अनेक ठिकाणी आकाशात वीज चमकण्याची तीव्रता अधिक असेल, असे संकेत रडार यंत्रणेने दिले आहेत. आजपासून पुढील चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारी (17 ऑक्टोबर) कोकण, घाट परिसर आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यात वेगवान वाऱ्यांच्या साथीने मुसळधार पावसाची (heavy rains) शक्यता आहे.