या अटीवर करुणा शर्मा यांचा जामीन मंजूर; काय आहे अट पहा…

बीड दि.21 सप्टेंबर – करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यावर अॅट्रॉसिटी (Atrocity) आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातच जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल (Pistol) आढळल्याप्रकरणी त्यांना अटक होवून न्यायालयीन कोठडी (judicial custody) सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता करूणा शर्मा यांना दिलासा मिळाला असून करुणा शर्मा यांनी दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल होईपर्यंत परळी, अंबाजोगई तालुक्यात यायचं नाही. या अटीवर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
(Karuna Sharma granted bail; See the condition imposed by the court …)
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज करूणा शर्मा यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. करूणा शर्मा यांना 5 सप्टेंबरला अटक झाली होती. करुणा शर्मा यांनी आपण धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेने त्यांच्यावर जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला असा आरोप केला होता. त्यानंतर करुणा शर्मांसह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता.
परळी पोलिसांनी (Police) त्यांना 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांची सुनावणी पुढे ढकलली जात होती. आज न्यायालयाने त्यांना काही अटीवर जामीन मंजूर केला आहे.
बीडच्या परळीत प्राणघातक हल्ला आणि ॲट्रॉसिटी ऍक्टच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या,करुणा शर्मा यांचा जामिनावर 20 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली न्यायाधिश एस.एस.सापटनेकर यांच्यासमोर दोन्हीबाजूंनी युक्तिवाद झाला. करुणा शर्मा ह्या मागील पंधरा दिवसापासून बीडच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आज त्यांचा 16 वा दिवस आहे.
अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयात 20 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली असून निकाल राखीव ठेवण्यात आला होता. वैयक्तिक 25 हजाराच्या जातमुचलक्यावर (जामीन) आणि नगदी 5 हजार प्रत्येकी या अटींवर दोघांचा जामीन (Bail) मंजूर केला आहे. दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत बीड जिल्ह्यातील परळी आणि अंबाजोगाईत येण्यास बंदी घालण्यात आली.हा निकाल आज न्यायाधीश एस एस सापटनेकर यांनी दुपारी दिलाय. दरम्यान करुणा शर्मा यांना 15 दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागले असून या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.