उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लॉकडाऊनचा निर्णय-राजेश टोपे

पुणे दि.22 मार्च – कोरोनाचा संसर्गाचा धोका पुन्हा एकदा वाढत चाललेला आहे. कोरोना रुग्णांचा (Corona Positive) वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तरी देखील अनेक नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाही. लोकांना गांभीर्य नसल्याचे वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समोर राज्याची कोरोना परिस्थिती पाहुन लॉकडाऊनचा (lockdown) निर्णय घेण्याचे सुचक वक्तव्य राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले.
(The decision of lockdown will be discussed with the Chief Minister tomorrow – Rajesh Tope)
राज्यात रविवारी तब्बल ३० हजार ५३५ नव्या कोरोना रुग्णांची (Corona Positive) भर पडली. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असल्याने राज्याची वाटचाल ही बिकट परिस्थितीकडे होत असल्याचं दिसून येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन (lockdown) करण्यात आला असला तरी मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून लोक मात्र याकडे गांभिर्याने पाहत नाहीत.
या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महत्वाचे भाष्य केले आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे चिंता वाढत आहे. उद्या याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईल. काही दिवस दिले जातील. लगेच उद्या लॉडकडाऊन जाहीर होणार नाही, असेही राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचं असेल तर जनतेनं नियम पाळायला हवे, असं आवाहनही टोपे यांनी नागरिकांना केलंय. अजून 2-4 दिवस कोरोना रुग्ण वाढण्याचा अंदाज आहे. त्यानंतर हे प्रमाण कमी होईल, असा अंदाज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.