औरंगाबाद मध्येही लॉकडाऊन जाहिर; आजपासून राज्य सरकारची नवी नियमावली लागू ….

मुंबई/औरंगाबाद दि.27 मार्च – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन चा पर्याय निवडण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट येेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजपासून 15 एप्रिल पर्यंत नवी नियमावली (New guidelines) लागू करण्यात आली आहे. तर औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने 30 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत कडक लॉकडाऊन (lockdown) जाहिर केला आहे.
(Lockdown announced in Aurangabad too; New rules of state government will be implemented from today ….)
औरंगाबाद मध्ये कडक निर्बंध लावूनही कोरोना संसर्ग रोखण्यात अपयश आले आहे. दिवसेंदिवस वाढणारी कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या प्रशासनाची डोकेदुखी वाढवणारी ठरली आहे. शेवटी आज जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दि.30 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत कडक लॉकडाऊन (lockdown) जाहिर केला आहे.
दरम्यान, राज्य शासनाने आजपासून 15 एप्रिल पर्यंत नवीन नियमावली (New guidelines) जाहिर केली आहे. नवे नियम पुढील प्रमाणे असणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य असणार आहे, तर मास्क न लावल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करणं नागरीकांना अनिवार्य असणार आहे, पाच पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 100 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे, सर्व बागा आणि समुद्र किनाऱ्यावर निर्बंध, बार आणि हॉटेल, सिनेमागृह रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला देण्यात आला आहे. सर्व खाजगी कार्यालयात 50 टक्के उपस्थिती,
कोणत्याही स्वरुपाचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. ऑडिटोरियम, नाटयगृहं यांचा वापर उपरोक्त कार्यक्रमांकरीता करता येणार नाही. लग्न समारंभाला 50 पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही. या नियमाचं उल्लंघन केल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अंत्यविधीला 20 पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही. विलगीकरणात असलेल्या व्यक्तींची माहिती स्थानिक प्रशासनाला ठेवणं अनिवार्य करण्यात आलं आहे.
क्वारंटीन असलेल्या व्यक्तीच्या घराबाहेर तसं फलकाद्वारे सूचित करणं आवश्यक करण्यात आलं आहे. घरात क्वारंटीन व्यक्तींच्या हातावर स्टँप मारण्यात येणार आहे. कोरोना बाधित (Corona Positive) व्यक्तीच्या घरातील सदस्यांनी बाहेर जाणंयेणं मर्यादित ठेवावं. मास्कविना वावरू नये. क्वारंटीन नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीला जवळच्या कोव्हिड केंद्रात नेण्यात येईल असं सरकारने म्हटलं आहे. सार्वजनिक वाहतूक पुर्ण बंद राहणार आहे.