देशात लागणार लॉकडाऊन ? केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांचं सुचक वक्तव्य

नवी दिल्ली दि.27 मार्च- ‘कोरोनाला रोखण्यासाठी अंशत: लॉकडाऊन (lockdown) फारसं प्रभावी नाही.’ असं वक्तव्य केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन (Union Health Minister Harshvardhan) यांनी केले आहे. हर्षवर्धन यांनी देशातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली. देशातील कोरोनाचा ससंर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यात नाइट कर्फ्यु तसेच अंशत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावर बोलताना हर्षवर्धन यांनी ‘कोरोनाला रोखण्यासाठी अंशत: लॉकडाऊन फारसं प्रभावी नाही.’ असे वक्तव्य केल्यामुळे आता देशात लॉकडाऊन (lockdown) लागणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. देशातील महाराष्ट्र, केरळ व पंजाबसह काही राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. देशभरात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
(Lockdown in the country? Union Health Minister Harsh Vardhan’s suggestive statement)
एका कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन यांनी सांगितलं की, सोशल डिस्टन्सिंगचं पालन झाल्यास कोरोनाला रोखता येऊ शकतं. मात्र अंशत: लॉकडाऊन किंवा नाइट कर्फ्यू, आठवड्याच्या शेवटी करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनचा फारसा फरक पडत नाही. सरकार लसीकरण (Vaccination) मोहिमेचा वेग वाढवण्यावर विचार करत आहे. लसीकरणासाठी असलेली वयोमर्यादा कमी करण्यात येत आहे. सरकार आता कोरोनाला रोखण्यासाठी आधीच्या तुलनेत अधिक तयारीने प्रयत्न करत आहे. देशात सध्या सहा लशींवर काम सुरु आहे. या लशींची ट्रायल वेगवेगळ्या टप्प्यात आहे. त्यामुळे आशा आहे की, लवकरच देशाला आणखी लशी मिळतील. आता दोन लशींना परवानगी मिळाली असून त्याचे डोस नागरिकांना दिले जात आहेत.
दोन्ही लशी सुरक्षित
हर्षवर्धन यांनी सांगितलं की, कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड व्हॅक्सिन पूर्णपणे सुरक्षित आहेत. देशात वापर करण्यात येत असलेल्या या लशींच्या सुरक्षिततेबाबत अद्याप कोणत्याही प्रकारची तक्रार आलेली नाही. ज्या देशांमध्ये लशींबाबत तक्रार आहे तिथले सरकार प्रकरणांची चौकशी करत आहेत .भारतात लसीकरणानंतर (Vaccination) दुष्परिणाम दिसतात का यासाठी एक चांगली व्यवस्था तयार करण्यात आली असल्याचेही केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन (Union Health Minister Harshvardhan) यांनी सांगितलं.