अधिवेशनानंतर राज्यात होवू शकतो लॉकडाऊन…. मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

मुंबई : दि.9 मार्च- गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनच देशभरात कोरोनाने हाहाकार माजवला होता. यानंतर, संपूर्ण देशभर कडक लॉकडाऊन (lockdowan) करण्यात आले होते. कोरोना आटोक्यात आल्यानंतर जनजीवन सुरळीत झाले, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकार वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Lockdown may take place in the state after the convention …. Meeting held by the Chief Minister)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thakre) यांनी काल वर्षा बंगल्यावर राज्यातील कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), आरोग्य विभागाचे अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व्हीसीद्वारे उपस्थित होते. कोरोनाबाधा झाल्यानंतर होम कोरोंटाईन असलेले आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे आपल्या बंगल्यावरून बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत संपूर्ण राज्यातील कोरोनास्थितीचा आढावा घेत उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. नुकताच केंद्रीय कोरोना नियंत्रण समितीने दौरा केला आहे. राज्य सरकारकडून अधिवेशनानंतर कोरोनाच्या (corona virus) स्थितीचा आढावा घेऊन निर्बंध अधिक कडक केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. १० मार्च रोजी राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर राज्यात कडक निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे.

प्रमुख शहरातील कोरोनास्थिती…
पुणे (Pune) आणि ग्रामीण भागा प्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात ही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात गेल्या काही दिवसात सरासरी ५०० रुग्ण आढळले आहेत. शहरात काल म्हणजेच ७ तारखेला ६२९ रुग्ण, ६ तारखेला ५७३ रुग्ण, ५ तारखेला ६०२ रुग्ण, ४ तारखेला ५०२ रुग्ण तर ३ तारखेला ४८३ रुग्ण वाढले आहेत. नागरिकांनी नियमांच योग्य पालन केलं नाही तर कठोर पाऊल उचलण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.

नागपुरातही (Nagpur) कोरोना कहर सुरूच आहे. सोमवारी नागपुरात १२७६ नवीन रुग्ण वाढले आहेत. ज्यामध्ये शहरात १०३७ तर ग्रामीणमधील २३६ रुग्णांचा समावेश आहे. आज नागपुरात कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असताना पुन्हा लॉकडाऊन (lockdown) लागतो की काय, अशी भीती सर्वसामान्यांना वाटते आहे. राज्यात जेथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत अशा ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्याचा विचार सुरु असल्याचं म्हटलं आहे.

मागील एक वर्षापासून डोकेदुखी ठरत असलेला करोना मध्यंतरी अटोक्यात आल्याचे चित्र होतं. मात्र आता पुन्हा रुग्णसंख्या वाढत आहे. महाराष्ट्रातील नागपूर व औरंगाबादमध्ये (Aurangabad) देखील रुग्णवाढीची स्थित गंभीर आहे. या दोन जिल्ह्यात करोना नियमांची कडक अमलबजावणी सुरू असताना आता अहमदनगर जिल्ह्यातून चिंता वाढवणारी बातमी येत आहे.

राज्यात कोरोना संसर्ग (corona virus) पुन्हा एकदा वाढला असून अनेक शहरामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक (Nashik) , मुंबई (Mumbai), औरंगाबाद (Aurangabad), पुणे (Pune), अहमदनगर (Ahemadnagar), नागपूर (Nagpur) यासारख्या मोठ्या शहरांमध्ये तर कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या शहरांतील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ही शहरं पूर्ण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे म्हटलं जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!