शेती विषयक

मराठवाड्यातील ‘या’ जिल्ह्यांना अजूनही पावसाचा धोका; 24 तासात होईल मुसळधार.

मुंबई दि.22 सप्टेंबर – राज्यात गेल्या काही दिवसात पावसाने दांडी मारली होती. परंतु बंगालच्या उपसागरात परत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे राज्यात गेली दोन दिवस पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या 24 तासात मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यांसह इतर ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानो वर्तवली आहे.

‘These’ districts of Marathwada still at risk of rains; It will be torrential in 24 hours.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे वारे पुढील काही वेळात उत्तरेकडील ओडीशा, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या राज्यांकडे सरकणार असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील दिसून येणार आहे. यामुळे हवामान खात्याने (Meteorological Department) राज्यातील काही जिह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

येत्या 24 तासात राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, अहमदनगर, ओरंगाबाद, बुलडाणा, अकोला, परभणी आणि नांदेड हे आठ जिल्हे वगळता राज्यात सगळीकडे येलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील वाशिम यवतमाळ, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कटकडाटसह मुसळधार पाऊस (heavy rains) पडणार आहे. त्यामुळे या जिह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दरम्यान, सप्टेंबर महिन्यापासून राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांतील पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात असलेले उभं पिकाला पावसाचा फटका बसला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. महाराष्ट्रातील बहुतेक सिंचन प्रकल्प भरली आहेत. दि.21 रोजी मराठवाड्यातील मांजरा धरण यंदाही 100 टक्के भरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!