महाराष्ट्रात पुन्हा कठोर निर्बंधाचे सावट; रुग्ण संख्या वाढीसह हे आहे कारण….

मुंबई दि.24 जून – काही जिल्ह्यांतील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत झालेली वाढ, कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस विषाणूचा (Corona virus) धोका, आणि बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यांमुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी दि.23 रोजी घेण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात याची घोषणा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
(Maharashtra again faced stricter restrictions; This is because with the increase in the number of patients ….)
1 जूनपासून राज्यातील जिल्ह्यांना पाच स्तर करुन नवीन सुत्र अवलंबून निर्बंधात सुट देण्यात येत आहे. मात्र काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्बंध शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असून, दुकानांच्या वेळा पुन्हा कमी करण्यात येण्याचे संकेत आहेत.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक दि चैन (Break the chain) मोहिम राबवत गेल्या तीन महिन्यांपासून लागू असलेले कठोर निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय 1 जूनपासून घेण्यात आला होता. त्यानुसार कोरोना बाधितांचे साप्ताहिक प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटांची व्याप्ती या दोन निकषांच्या आधारे राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांत विभागणी करण्यात आली होती.
दर आठवड्याला परिस्थितीनुसार हे निर्बंध कमी अधिक प्रमाणात लागू करण्याचे धोरण राबविण्यात आले होते. गेल्या तीन आठवड्यांपासून या धोरणानुसार महापालिका आणि जिल्हा स्तरानुसार निर्बंध लागू केले जात आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत 67 हजार 330 उपचाराधीन रुग्ण असून सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक, रायगड या पाच जिल्ह्यांत 26 हजार 630 असे 10 जिल्ह्यांत 94 हजार उपचाराधीन रुग्ण आहेत. तर 42 हजार रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
दहा जिल्ह्यांतील साप्ताहिक बाधितांचे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहेत. ब्रेक दि चैन (Break the chain) मोहिमेतील निर्बंध (restrictions) शिथिल केल्यापासून बाधितांच्या प्रमाणात सातत्याने कमी अधिक वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याबाबत मंत्रिडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते. सध्याच्या सूत्रावर आणि त्याच्या अंमलबजावणीवर मुख्यमंत्रीही नाराज असून तिसऱ्या लाटेच्या (Third wave of corona) भीतीमुळे निर्बंध पूर्वीप्रमाणे कठोर करण्यावर बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार सध्याची पद्धती बदलून किंवा ती रद्द करून नवीन निर्बंधांबाबत दोन दिवसांत आदेश काढण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
निर्बंध शिथिलीकरणानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राज्यात कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणूचे (डेल्टा प्लस) 21 रुग्ण आढळून आले. या विषाणूचा संसर्ग (Corona virus) वाढण्याचा धोक्याचा इशारा केंद्र सरकारने दिल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात येणाला असल्याचे कळते.
सध्याच्या निर्बंध (restrictions) शिथिलीकरणाच्या पंचस्तरीय पद्धतीत बदल करण्यात येणार असून हे निकष अधिक कठोर करण्यात येणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी नियम अधिक कठोर करून अत्यावश्यक वगळता इतर दुकानांच्या वेळाही कमी करण्यात येण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत याबाबतची नियमावली जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
दरम्यान, गेल्या अडिच ते तीन महिन्यापासून लादण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. व्यापारी वर्गासह सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडलेला असताना पुन्हा कडक निर्बंध लागण्याच्या निर्णयामुळे लोकांत अस्वस्थता दिसत आहे. तिसरी लाट (Third wave of corona) किंवा नवीन विषाणू संसर्गाच्या संभाव्य धोक्यात लोकांवर निर्बंध लादण्याचा निर्णयाला मोठा विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.