महाराष्ट्र पोलीस दलात मेगा भरती; एकुण 12 हजार 200 पद भरणार.

औरंगाबाद दि.13 जुलै – महाराष्ट्र पोलीस दलात (Maharashtra Police) एकूण 12 हजार 200 पदांची भरती (recruitment) होत असून पहिल्या टप्प्यात 31 डिसेंबर पूर्वी 5200 पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार असून त्यानंतर 7 हजर पदे भरले जातील अशी माहिती राज्याचे गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
(Mega recruitment in Maharashtra Police Force; A total of 12 thousand 200 posts will be filled.)
गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी औरंगाबाद परिक्षेत्राची बैठक घेतली. याबैठकीत कायदा व सुव्यवस्था परिस्थिती आणि गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण, गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कर्मचाऱ्यांना चांगली घरे चांगली सुविधा मिळाव्यात याबाबत चर्चा करण्यात आली आहे.
वळसे पाटील काय म्हणाले?
“राज्यात पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांसाठी मेगाभरती (recruitment) केली जाणार आहे. याची दोन टप्प्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार या वर्षाच्या अखेरीस डिसेंबरमध्ये महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलामध्ये एकूण 5 हजार 200 जागांसाठी कोणत्याही परिस्थितीत पदभरती केली जाईल. तसेच यानंतर पुढे उर्वरित 7 हजार जांगाची भरती केली जाईल”, असं वळसे पाटील म्हणाले. वळसे पाटील सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळेस त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळस त्यांनी या भरती बाबत घोषणा केली.
आर्थिक आणि सायबर गुन्हे वाढले
सर्वसामान्य माणसाला सौजण्याची वागणूक मिळाली पाहिजे. महिला आणि त्याबाबत घडणारे गुन्हे याबाबत आस्थेवाईकपणे निर्णय घेतले पाहिजे. दोषींना शिक्षा केली पाहिजे या सूचना दिल्या असल्याचे दिलीप वळसे पाटील म्हणाले.
आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्हे (cyber crime) यांचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर शाखेने चांगले काम केले पाहिजे. सोशल मीडियातून (social media) महिलांची बदनामी केली जाते याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्यांना कर्ज मिळत नाही ते वाटप करण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे. संख्या वाढत आहे, रक्कम वाढत आहे, कोविडची (Covid-19) अडचण आहे पण कर्जासाठी मदत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोविडमध्ये (Covid-19) ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचे धोरण गृहविभागाचे आहे. काही ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे, 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे काम पूर्ण झाले आहे, जे राहीले आहेत त्यांना पण तातडीने आर्थिक मदत केली जाईल, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.