मुलांना क्लासेस लावण्यासाठी गेलेल्या पालकांवर काळाचा घाला; विचित्र अपघातात चौघांचा मृत्यू;

जिंतूर दि.14 जून – जिंतूर – सेनगाव रस्त्यावर भरधाव कार थेट पुलाचे काम चालू असलेल्या खड्याड पडून झालेल्या विचित्र अपघातात (Accident) कार पाण्यात बुडून चार जणांचा मृत्यू झाला. हि घटना रविवारी मध्यरात्री घडली.
(Put time on parents who have gone to get their children to take classes; Four killed in bizarre accident;)

हिंगोलीच्या राज्य महामार्गावर घडलेल्या या विचित्र अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. येथील सेनगावनजीक हा प्रकार घडला. या मार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. मात्र, या पूलाचे काम बऱ्याच काळापासून रखडले आहे. या पुलासाठी एक खड्डा खोदण्यात आला होता.

सेनगाव शहरा जवळ सेनगाव -जिंतूर रस्त्यावर रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणारी कार पुलाचे काम चालू असलेल्या खड्यात पडली. या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले असल्याने कार पाण्यात बुडाली. कारचे काच बंद असल्याने कार मधील विजय ठाकरे रा.धानोरा, गजानन सानप, त्रंबक थोरवे या सह अन्य एक असे लोणार तालुक्यातील चार जणांचा मृत्यु झाला.

रात्रीच्या दरम्यान रस्त्यावर वाहतूक नसल्याने हा प्रकार उशिरा लक्षात आला. तोपर्यंत गाडी मधील चार हि जणांचा मृत्यू झाला होता. सदर चार हि जण आपल्या मुलांना क्लासेस लावण्यासाठी नांदेड येथे गेले होते. परत येत असताना हा दुदैवी अपघात (Accident) घडला.

चौघे मृत लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा, धानोरा येथील रहिवाशी आहेत. रखडलेल्या पुलावर कोणताही बोर्ड न लावल्यामुळे हा अपघात घटला. खड्ड्यात गाडी पडल्याने पाण्यात गुदमरून चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!