मुंबई बुडणार…. नासाचं धक्कादायक इशारा.

मुंबई दि.19 अॉगस्ट – पुढील दोन दशकांत अरबी समुद्रात मुंबई (Mumbai) बुडण्याची शक्यता नासाच्या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे. भारतातील सुमद्र किनारपट्टीच्या 12 शहरांबाबत धोका असल्याचेही यात म्हटलं आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे (Global warming) या दोन दशकांत अरबी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत 0.11 ते 0.14 मीटरनं वाढ होणार असल्यामुळे धोका व्यक्त करण्यात आला आहे.
(Mumbai will sink …. NASA’s shocking warning.)
नासानं (NASA) केलेल्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीचा अभ्यास करण्यासाठी नासानं सी लेव्हल टूल (Sea level tool) तयार केलं. त्यानुसार काढलेल्या अंदाजात केवळ मुंबईच नव्हे तर समुद्र किनाऱ्यालगतच्या भारतातील 12 शहरांपुढे हा धोका निर्माण झाला आहे.
सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे आणि कार्बन उत्सर्जनामुळे ग्लेशियर (Glacier) वितळू लागलेत. त्यामुळे समुद्राची पाणी पातळी वाढणार आहे. नासाच्या अभ्यासातून ही धक्कादायक बाब उघड झाली आहे. 2 ते 3 दशकांत समुद्राची पाणीपातळी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महाराष्ट्रातील मुंबई, गुजरातमधील ओखा, कांडला, भावनगर, गोव्यातील मोरमुगाओ, कर्नाटकातील मंगळुरु, तामिळनाडूतील चेन्नई आणि तुतीकोरिन, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम, केरळमधील कोची, ओडिशातील पारादीप आणि पश्चिम बंगालमधील किडरोपोर या शहरांना याचा फटका बसणार आहे.